Availability: In Stock

श्री तुकारामबावांच्या अभंगांची गाथा

SKU: MH13

Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.

Store
0 out of 5

निवेदन 

पंढरपूरचा श्री विठ्ठल हा जसा आपल्या ‘विठोबा’ या मराठमोळ्या नावाने महाराष्ट्रीय समाजाच्या हृदयामध्ये अत्यंत आदरपूर्वक प्रस्थापित झाला आहे, त्याप्रमाणेच त्याचा परमभक्त संत तुकाराम यालाही महाराष्ट्राच्या मनामध्ये अद्वितीय आणि अलौकिक स्वरूपाचे स्थान मिळालेले आहे. मराठी भक्तजन श्री ज्ञानदेवांच्याबरोबरच संत तुकारामांनाही परमश्रध्येय मानतात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा उत्कट भावाने गजर करतात. श्री विठ्ठल, श्री नामदेव, संत तुकाराम ही महाराष्ट्राची आराध्य दैवते आहेत. श्री ज्ञानेश्वरांनी आपल्या अजोड प्रतिभेने जज्ञी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याच उत्कट भक्तीभावाने संत तुकारामांनी आपले अभंग लिहिले. तुकाराम हे महाराष्ट्रातील संत मंडळींचे शिरोभूषण मानले जातात. गेली साडेतीनशे वर्षे तुकारामांची गाथा महाराष्ट्राने हृदयाशी बाळगून आध्यात्मिक वाटचाल केली आहे.  

जनसामान्यांना प्रिय असलेल्या संत तुकारामांची सकल गाथा प्रसिद्ध करून ती सर्वांना उपलब्ध करण्याचा निर्णय तत्कालीन मुंबई सरकारने १९५० साली घेतला आणि शासनामध्ये न्यायमूर्ती या उच्च पदावर काम करतानाही अंतरीचे काव्यगुण जोपासणाऱ्या आणि संत वाड्मयाचा प्रगाढ व्यासंग असलेल्या स्व. पुरुषोत्तम मंगेश लाड या विद्वान सनदी अधिकाऱ्याची गाथेच्या संपादनासाठी नियुक्ती केली. लाड हे स्वतः उत्तम कवी होते आणि त्यांचा संत वाड्मय आणि आधुनिक कविता यांचा विशेष अभ्यास होता. तुकारामांची गाथा संपादित करून प्रकाशित करण्याचे महत्‌ कार्य लाडांनी स्वीकारले आणि आपल्या अतिशय विवेचक आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह १९५० साली तुकारामांची गाथा शासनातर्फे प्रथम प्रकाशित झाली. तिचे वाचकांनी अभूतपूर्व स्वागत केले. १९५५ साली तुकाराम बीजेला गाथेची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यानंतर १९७३ साली तिसरी आवृत्ती शासनातर्फे प्रकाशित झाली आणि आता ती दुर्मीळ झालेली आहे.  

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे श्री एकनाथी भागवत आणि श्री नामदेव गाथा हे दोन बहुमोल ग्रंथ पुन्हा प्रकाशित करण्याचे ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे दुर्मीळ झालेली तुकारामांची गाथासुद्धा पुन्हा वाचकांना उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार १९५० साली प्रथम प्रकाशित झालेल्या गाथेच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशनाचा सुयोग सध्याच्या मंडळाला लाभलेला आहे. श्री नामदेव, श्री एकनाथ आणि संत तुकाराम यांचे वाड्मय महाराष्ट्राला पुन्हा अल्प किंमतीत उपलब्ध करून देण्याची सुसंधी मंडळाचा अध्यक्ष म्हणून मला लाभली, हे मी माझे भाग्य समजतो. संत तुकारामांना विनम्र भावाने अभिवादन करून ही गाथा मी महाराष्ट्राच्या चरणी अर्पण करीत आहे.  मधु मंगेश कर्णिक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. 

Digital Book

Book info


998 in stock

  Ask a Question
Share...

Description

इ. स. १९७३ सालच्या आवृत्तीची प्रस्तावना 

भारतीय लोकजीवनात समता आणि एकात्मता प्रस्थापित करण्याचे महान कार्य करणाऱ्या भागवतधर्माच्या इमारतीचा पाया संत शिरोमणी ज्ञानोबारायांनी घातला तर त्या मंगल मंदिरावर कळस संतश्रेष्ठ तुकारामबावांनी चढविला. महाराष्ट्राचे हे परम भाग्य की त्याला संतकृपेची अखंड छाया लाभली. एवढे भौतिक परिवर्तन झाले असतानाही ‘ज्ञानोबा-तुकाराम’ या नावांचा गजर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून सतत आजही घुमत असून, या नामगजराश्ली खेड्यापाड्यांतील सर्वसामान्य जनता एकरूप झाली आहे. 

महाराष्ट्रात ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास या संतपंचकाने बहुमोल असे.साहित्य निर्माण करून जनसामान्यापर्यंत अध्यात्माचे विचार नेले आणि सामान्य जनतेला अध्यात्माची गोडी लावण्याचे एक महान ऐतिहासिक कार्य केले. परिणामतः राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही महाराष्ट्राची संस्कृती आणि अस्मिता शाबूत राहिली. म्हणून या लाडक्या संतांचे समग्र वाडमय म्हणजे महाराष्ट्राच्या समाजजीवनाचा एक अमूल्य असा सांस्कृतिक ठेवा आहे. या संतांच्या मालिकेत श्री तुकारामबावांचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यांनी सोप्या नामभक्तीचा महिमा पटवून आपल्या अभंगांद्वारे सुविचार व सदाचाराचा प्रसार केला व समाजात भक्तिमार्गाच्या द्वारा नवचैतन्य निर्माण केले आणि आपल्याबरोबरच साऱ्या समाजाला सन्मार्गाला लावले. त्यांच्या बहुमोल वाड्मयाचा ठेवा श्री तुकारामबावांच्या अभंगांची गाथा पुनर्मुद्रित करून कार्तिकी एकादशीच्या या पवित्र दिवशी महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित करीत असता मला विशेष आनंद होत आहे. 

श्री तुकारामबावांच्या गाथेचे मुद्रण व प्रकाशन दोन भागांत श्ञासनाने १९५० साली प्रथम केले, त्यानंतर त्यांचे पुनर्मुद्रण शासनातर्फे १९५५ साली करून एका पुस्तकातच छापून ती प्रसिद्ध केली. त्याच्याही प्रती फार लवकर संपल्या. मध्यंतरी महाराष्ट्र शासनातर्फे संत नामदेवांच्या सातश्षोव्या जयंतीनिमित्त श्री नामदेव गाथा १९७० साली प्रसिद्ध केली व १९७१ साली एकनाथषष्ठीला श्री एकनाथी भागवत अल्प मूल्यात जनतेस उपलब्ध करून देण्यात आले. त्यानंतर केव्हाच अप्राप्य झालेली श्री तुकारामबावांच्या अभंगांची गाथा पुनर्मुद्रित करून आज प्रकाशित करण्याचा योग येत आहे. 

विषयानुक्रम

  • निवेदन.
  • इ. स. १९७३ सालच्या आवृत्तीची प्रस्तावना…
  • इ. स. १९५० सालच्या आवृत्तीची प्रस्तावना…
  • इ. स. १९५५ सालच्या आवृत्तीची प्रस्तावना…
  • ॥ तुकारामाचे अभंग ॥
  • देहू व तळेगांव या प्रतींत खालीं लिहिल्या प्रमाणें ज्यांचा आरंभ झालेला नाहीं असे पंढरपुरच्या प्रतींतले अभंग.
  • तुकारामबावांच्या अभंगांतील कठीण शब्दांचा कोश. ….
  • अभंगांची अनुक्रमणिका…
  • परिशिष्ट…

सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां ॥ १२ ॥

मानियेला स्वप्नी गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं ॥ १३ ॥