Timb (टिंब)

Bibliophobia: The End and the Beginning of the Book

पुस्तकं पाच हजार वर्षं टिकली की! – Nilu damle

Bibliophobia: The End and the Beginning of the Book  – Brian Cummings. 

पुस्तकांची भीती/तिरस्कार हा प्रस्तुत पुस्तकाचा विषय आहे. माणूस पुस्तकांचा तिरस्कार करतो आणि पुस्तकावर प्रेमही करतो हे सांगता सांगता लेखक पुस्तक निर्मितीचा दीर्घ इतिहास या पुस्तकात चितारतो. 

पुस्तक ही एक वस्तू असते तसंच ती एक कल्पनाही आहे असा लेखकाचा सिद्धांत आहे.  

पुस्तक जाळा, पुरा, नदीत बुडवा, काहीही करा. 

पुस्तक टिकतं.

अभंग नदीत बुडवले. तरीही टिकले.


वाचाल तर वाचाल! नियमित पुस्तक वाचण्याचे ‘हे’ लाभ तुम्हाला माहित आहे का?

Benefits Of Reading Books

रोज पुस्तक वाचण्याचे अनेक लाभ आहेत. ही गोष्ट तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे. वाचनाने ज्ञान वाढते आणि तुमचा दृष्टीकोन सुधारतो. पुस्तके वाचणे कसे लाभादायी आहे ते जाणून घेऊयात.

असं म्हटलं  जातं की  “ The Person who dont read, has no advantage over the person who can’t read.” म्हणजेच जो व्यक्ती वाचन करीत नाही तो वाचता न येणाऱ्या अशिक्षित माणसासारखाच आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या संधी गमावत असतो. 

पुस्तके कशी वाचावी?

मानवी इतिहासात ग्रंथलेखनाची नांदी झाल्यावर अनेक उत्कृष्ट दर्जाची अक्षरवाङ्मय गणली गेलेली, मानवी मूल्यांची महत्ता सांगणारी साहित्यसंपदा आपल्या पूर्वसूरींनी निर्माण करून ठेवलेली आहे. लाखो लोकांनी शेकडो वर्षे ती वाचली, त्याची पारायणे केली. मानवी आयुष्य इतके मर्यादित आहे की तुम्ही २४ तास पुस्तके वाचत बसलात तरी तुमच्या बेभरवश्याच्या आयुष्यात काही हजारच पुस्तके वाचून होतील. भाराभर वाचनापेक्षा प्रत्यक्ष जीवनात उपयोगी ठरणारी निवडक अशी ज्ञान, माहिती, आनंद, अध्यात्म, काव्य, रसास्वाद,मार्गदर्शक ठरणारी आणि मनोरंजक  पुस्तके वाचावी. पुस्तक हे ज्ञानरंजनाचे साधन आहे, साध्य नव्हे. माणूस केवळ एका-मागोमाग पुस्तके आणत जातो व आपला ग्रंथसंग्रह वाढवत नेल्याने त्याच्याच मोहात अडकतो.

नुसत्याच सरधोपट वाचनापेक्षा निरक्षिर विवेकाने वाचावे.

मराठि भाषा

मी काय ओल्तो..

आपला भाषिक दर्जा घसरू लागला आहे, कारण आपल्या जगण्यातील वैचारिक दर्जा घसरू  लागला आहे, हे आधी मान्य करायला हवे..माधुरी पुरंदरे

हल्ली कोणीही कोणास अशुद्ध भाषेसाठी दोष देणे हे ब्राह्मणी मानले जाते. भाषा ही जात, आर्थिक स्तर, सांस्कृतिक पार्श्वभूमी अशा अनेक घटकांवर आधारित असते हे मान्य. परंतु तरीही भाषेचे, लिखित भाषेचे म्हणून काही प्रमाणीकरण  असतेच असते..

गोपाळ नीलकंठ दांडेकर (गोनीदा)

गोपाळ नीलकंठ दांडेकर हे एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. .तसेच गो.नी.दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते.

परीचितांमध्ये अप्पासाहेब आणि रसिक वाचकांचे गोनीदा, आपल्या बहुढंगी अयुष्याचे वेगवेगळे पदर अपल्या कथा- कादंबर्‍यांमधुन मांडणारे म्हणुन सुपरिचीत; इतिहास अभ्यासक, चळवळे कार्यकर्ते, अध्यात्मिक संशोधक, भटके निसर्ग प्रेमी अशा कित्येक गोष्टी-छंदांमुळे समृद्ध जीवन जगलेले आणि तेच वाचकांपुढे ससाळ आणि सुंदर शैलीत मांडणारे ग़ोनिदा वाचकांना नेहमीच भुरळ घालतात.

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

औपचारिक शिक्षण फारसे-मॅट्रिक-पर्यंतही-झाले नाही. तथापि स्वप्रयत्नाने वाङ्‌मयाचा व्यासंग केला.माणदेशी माणसे (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला, त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी साहित्याला अनोखे होते. अद्‌भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला. 

ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. बनगरवाडी (१९५५), वावटळ (१९६४), पुढचं पाऊल (१९५०), कोवळ दिवस (१९७९), करुणाष्टक (१९८२) आणि सत्तांतर (१९८२) ह्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. 

रानोमाळ स्वच्छंद भ्रमंती करणारे निसर्गप्रेमी, शिकारी तसेच चित्रकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे. चित्रकलेचे कसलेही औपचारिक शिक्षण नसताना त्यांनी ही कला प्राप्त केली जागतिक कीर्तीच्या चित्रकारांच्या चित्रशैलीचा रसिकतेने शोध घेतला. त्यांची अनेक सुंदर रेखाटने प्रसिद्ध झालेली आहेत. आकाशवाणीवर ते दीर्घकाळ (१९५५–८५) नोकरीत होते.

[email protected]

श्री.ना. पेंडसे – श्रीपाद नारायण पेंडसे

आपल्या कथा कादंबऱ्यांतून कोकणातील विश्व आणि लोकजीवन चितारणाऱ्या श्री.नां. नी नंतर महानगरीय अनुभवही तितक्याच ताकदीने आपल्या कादंबऱ्यांतून व्यक्त केले. श्री.नां. यांच्या कादंबरीने एक नवी वाट चोखाळली. मराठीत  कादंबरीची नवी शाखा, नवी प्रकृती त्यांच्या कादंबऱ्यांपासून रूढ झाली.

[email protected]

एस. एल. भैरप्पा

अर्धशतकाहून अधिक काळ तेवीस कादंबर्‍या आणि आश्चर्यकारकपणे प्रामाणिक आत्मचरित्र लिहीणारा साहित्यिक,  भारतातील सर्वाधिक अनुवादित कादंबरीकार म्हणून,  साहित्य, सौंदर्यशास्त्र, तत्वज्ञान आणि संगीत यांचा अप्रतिम संगम काल्पनिक कथानकात  करणारा अभ्यासू म्हणून; अनंत प्रकारे करता येऊ शकते. 

या सम हा : श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्र

या सम हा : श्रीकृष्णाचं वैचारिक चरित्र – डॉ. सदानंद मोरे

पाने :  300 मुल्य (₹): 350.0

कृष्णाकडे ईश्वरी अवतार म्हणून पाहण्याऐवजी इहलोकातील मानव म्हणून पाहून त्याने चरित्र लिहिणे पसंत करण्याचे कारण सरळ आहे. अवताराचे म्हणजे वैकुंठादि लोकातून इहलोकात अवतरलेल्या ईश्वराचे, त्याच्या कृतीचे अनुकरण करणे मनुष्याच्या शक्तीबाहेर आहे असे समजून त्याला देव्हाऱ्यात ठेवून किंवा त्याची मंदिरात प्रतिष्ठापना करून त्याची पूजाअर्चा करण्यातच धन्यता मानली जाते. याउलट ‘तो तुमच्या-आमच्यासारखा मनुष्य असून, स्वप्रयत्नाच्या बळावर त्याने परमेश्वरासारखा आदरभाव संपादन केला, अशी भूमिका घेतली’ तर त्याने केलेल्या कृती मानवी क्षमतेच्या कक्षेत येऊन त्यांचे अनुकरण करणे शक्य होते. हा दैवी अवतरण (खाली येणे) आणि मानवी आरोहण यांच्यातील फरक आहे. कृष्णचरित्राची ही दोन प्रारूपे आपल्यापुढे आहेत. पहिल्या प्रारुपात तो भज्य, पूज्य, वंद्य ठरतो; तर दुसऱ्यात तो अनुकरणीय आदर्श बनतो. –महेश नाईक

EMF Shielding अर्थातच कवच कुंडले

अनधिकृत, अगदी अधिकृत मोबाईल टॉवर एक समस्या आहे. मोबाईल टॉवर ची रेडिओ frequency पॉवर (तरंग शक्ती) ची अधिकृत मर्यादा इतकी जास्त आहे जणू वाहनवेगाची कमाल मर्यादा ताशी १००० किलोमीटर ठेवणं! टॉवर च्या लगतच्या परिसरात राहण्याऱ्या सर्वसामान्यांना मात्र ह्याचा दुष्परिणाम सहन करत करतच जगावे लागते, परिणामी अनेकदा ह्यातून उद्भवणाऱ्या दुर्धर आजारांना तोंड देता देता मनुष्य हतबल होऊन जातो. अश्या वेळी लढा देतांना आपण आपल्यासाठी कवचकुंडले बनविणे हे जास्तीत जास्त श्रेयस्कर असते, हा मुद्दा लक्षात घेऊन खालील माहिती संकलित केलेली आहे…. एकूणच माहितीचे संकलन हे प्रसार प्रचार ह्यासाठी केलेलं आहे.

Shopping cart close