Timb (टिंब)

अप अगेन्स्ट डार्कनेस (मराठी) फिटे अंधाराचे जाळे

फिटे अंधाराचे जाळे

निसर्गतः प्राप्त झालेले सुखदायी आयुष्य सोडून दुर्बलांच्या, वंचितांच्या उत्थानासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या व्यक्ती म्हणजे जणू माणसांमधील देवदूतच. स्वार्थ बाजूला ठेवून समाजातील पीडितांच्या दुःखावर फुंकर घालणारी ही सामान्य माणसेच असामान्य कार्य करून दाखवतात. शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी काम करणार्या ‘स्नेहालय’ संस्थेचे डॉ. गिरीश आणि प्राजक्ता कुलकर्णी हे अशाच व्यक्तीपैंकी एक. आपल्या कार्यातून समाजाला सकारात्मकतेच्या ‘प्रकाशवाटा’ दाखवणाऱ्या या दांपत्याची प्रेरणादायी आणि भावस्पर्शी कहाणी ‘अप अगेन्स्ट डार्कनेस’ या मेघा देशमुख भास्करन लिखित पुस्तकात उलगडली आहे.

 अप अगेन्स्ट डार्कनेस (मराठी) फिटे अंधाराचे जाळे

आधुनिक कथा आणि पुराणकथांचा एक अनोखा संगम

अक्षत गुप्ता यांच्या “द हिडन हिंदू” त्रयीमध्ये आधुनिक कथा आणि पुराणकथांचा एक अनोखा संगम आहे. यामध्ये मुख्य पात्र अमर्यादाच्या माध्यमातून एका वेगळ्या जगातली प्रवास कथा उलगडते. गुप्ता यांनी रहस्य, विज्ञान आणि आध्यात्म यांची सांगड घालत एक विचारप्रवर्तक कथा निर्माण केली आहे हे नक्की!

मिशन सेमीकंडक्टर्स

मिशन सेमीकंडक्टर्स

सेमीकंडक्टर्स म्हणजे काय? सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाचा शोध कसा लागला? निरनिराळे देश यात कसे सामील झाले? इंटेल, ॲपल, हुवावे, सॅमसंग यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांबरोबरच ‘आर्म‌’ सारख्या फारशा प्रसिद्ध नसलेल्या कंपनीची स्थापना कशी झाली? याची रोचक कहाणी डॉ. माधवी ठाकूरदेसाई यांनी लिहिलेल्या ‘मिशन सेमीकंडक्टर्स‌’ या पुस्तकात वाचायला मिळते.

शोध आणि बोध - प्राचीन शेती तंत्र विज्ञानाचा

शोध आणि बोध – प्राचीन शेती तंत्र विज्ञानाचा

कृषिपराशर, वृक्षायुर्वेद, उपवनविनोद अशा अनेक बहुमोल ग्रंथांचा धांडोळा घेऊन शेतीविषयक तंत्र आणि विज्ञानाचा शोध, वाचन, अभ्यास, प्रयोग या चतुःसूत्रीच्या निकषांवर आधुनिक दृष्टिकोनातून वेध घेणारा ग्रंथ. 

 लेखक: रविंद्र अनंत साठे

माझ्या मते माहितीची उपलब्धता हा समाजप्रबोधनाचा महत्वाचा घटक आहे, प्राचीन शेतीविषयक समाजजाणीव, सुसंगत,तपशीलवार माहिती समाजातील जिज्ञासू, विद्यार्थी, शिक्षक,संशोधक व अगदी सर्वसामान्य शेतकरी बंधूंना ह्या पुस्तकाद्वारे अत्यंत उपयोगी ठरणार आहे. प्राचीन शेतीविषयी इतकी सुसंगत, नावीन्यपूर्ण माहिती देणारे मराठी पुस्तक माझ्या तरी वाचनात आलेले नाही. त्यामुळे मराठी वैज्ञानिक साहित्यात ह्या पुस्तकाद्वारे मोलाची भर पडलेली आहे, असे मला खात्रीने वाटते. –  पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद प्र. मोघे

ारतीय नौका नयनाचा इतिहास

‘भारतीय नौका नयनाचा इतिहास’ – डॉ. द. रा. केतकर

डॉ. केतकरांनी ‘भारतीय नौका नयनाचा इतिहास’ प्राचीन काळ, मराठा आरमार (मध्ययुगीन कालखंड) आणि ब्रिटिश साम्राज्य काळ (म्हणजेच पेशवाई अस्ताला गेल्यानंतर साधारणपणे १८१८ ते १९४७ स्वातंत्र्य मिळेपर्यंत ) अशा तीन भागात मांडला आहे. सिंदिया स्टीम आणि इतर कंपन्यांसंबंधी विस्तृत माहिती वाचकाला तिसऱ्या भागात मिळते. 

भारतीय नौकानयनाचा स्वातंत्र्यप्राप्ती पर्यंतचा समग्र इतिहास या एका ग्रंथात अभ्यासकाला मिळतो. त्यामुळे संदर्भ ग्रंथ म्हणून याचे मोल जास्त आहे.

अरुण भंडारे 

The Golden Road: How Ancient India Transformed the World

भारताचा सुवर्ण काळ – निळु दामले

The Golden Road: How Ancient India Transformed the World -William Dalrymple (Bloomsbury)

भारताचा इतिहास अनेक इतिहासकार आणि संशोधकानी मांडला आहे. भारतात एकेकाळी वैभव होते हे बहुतेक सर्वानी मान्य केलं आहे. विल्यम डॅलरिंपल तेच या पुस्तकात मांडतात, पण आजवर ठळकपणे न मांडले गेलेले काही पुरावे ते या पुस्तकात वाचकांसमोर ठेवतात.उदा. रोममधे सापडलेले लेखी पुरावे. डॅलरिंपल यांची शैली रंजक आहे हे, नाट्यमय आहे. पण नाट्यमयतेच्या नादी लागून पुराव्यांपासून ते दूर जात नाहीत. थोडक्यात म्हणजे ते कादंबरी किवा नाटक लिहीत नाहीत, इतिहासच लिहितात.

साहित्यिक आणि विचारवंत नरहर कुरुंदकर

साहित्यिक आणि विचारवंत नरहर कुरुंदकर (Narhar Kurundkar) – एक प्रसिद्ध लेखक, मराठी भाषा आणि साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून नरहरी कुरुंदकर यांनी ओळखलं जातं.

कुरुंदकरांवरचा मार्क्सवादाचा प्रभाव, तरीही त्यांची लोकशाहीवरील अढळ श्रद्धा या बाबी मी फारशा विचारात घेतल्या नाहीत. त्यांचे बिनतोड तर्क वापरुन काढलेले निष्कर्ष मला जास्त महत्त्वाचे वाटले. आजही वाटतात. विचारसरणी कुठलीही असो जर पुरावे पक्के असतील, युक्तीवाद भक्कम असेल तर समोर आलेलं सत्य कितीही कडवट असो मान्य करायला हवं हीच गोष्ट मी सर्वप्रथम कुरुंदकरांकडून शिकलो. माझ्या अनेक श्रद्धास्थानांना कुरुंदकरांच्या लिखाणामुळे धक्का बसला. काहीवेळा तो पचवणं जडही गेलं पण दुसरा इलाज नव्हता. कुरुंदकर प्रत्येक मुद्दा आपल्या असामान्य बुद्धीने क्ष किरणाप्रमाणे भेदूना आरपार विवेचन करतात तेव्हा त्यांनी काढलेल्या निष्कर्षाशिवाय दुसरा काही निष्कर्ष निघूच शकणार नाही असं वाटत राहतं.

The Anxious Generation

चिंता विकाराचा प्रसार । The Anxious Generation – Jonathan Haidt -निळू दामले

The Anxious Generation: How the Great Rewiring of Childhood Is Causing an Epidemic of Mental Illness –  Jonathan Haidt

आपलं कसं होणार याची चिंता माणसाला असते. सभोवतालची परिस्थिती इतकी अनुपकारक असते की आपल्याला अपयश येणार, धडक बसणार असं माणसाला पदोपदी वाटत असतं. आपण कमी पडतो असंही माणसाला वाटतं. असं सतत वाटत असण्यातून नैराश्य येतं.

या विकारानं ग्रासलेल्या माणसाची कार्यक्षमता कमी होते, माणसं कामातून जातात, ढिली होतात, ढिम्म होतात. आत्महत्याही करतात.

प्रस्तुत पुस्तक विचार करायला लावतं, आपल्याला चिंताग्रस्त करतं.

रामाच्या पदचिन्हांवरून पुष्पक विमानाने पंख पसरले

कालिदासाच्या मेघदूताचा हवाईमार्ग तपासणारे वैमानिक डॉ.भावे

रामाच्या पदचिन्हांवरून – मकरंद करंदीकर

पुण्यामधील डॉ.भावे हे अत्यंत निष्णात शल्यचिकित्सक !  मेघदूत आणि रघुवंश ही महाकाव्यांचा पूर्ण रसास्वाद घेण्यासाठी डॉ. भावे यांनी संस्कृतमध्येही पारंगत्व मिळविले. रघुवंशातील रामाच्या पदयात्रेच्या मार्ग प्रत्यक्ष शोधण्यासाठी जैन रामायणापासून ते बाली बेटातील रामायणापर्यंत वेगवेगळ्या १५० प्रकारच्या रामायणांचा शोध घेतला. 

कालिदासाने मेघदूतामध्ये वर्णन केलेल्या, नागपूरपासून हिमालयापर्यंतच्या हवाईमार्गाचे ( Navigation Log ) डॉ. भावे यांनी आपल्या विमानातून प्रत्यक्ष निरीक्षण करून त्याचे संपूर्ण छायाचित्रण केले. ज्यावेळी आकाशात उडण्याची कला नव्हती किंवा विमाने अस्तित्वात आली नव्हती असे जग मानते ( आपल्या पुराणकालात अद्ययावत विमानविद्या अस्तित्वात होती ) तेव्हा कालिदासाने हे संपूर्ण अवकाशवर्णन इतके अचूकपणे कसे केले असेल ? कालिदासाच्या त्या वर्णनाची अचूकता पाहून त्यांनी कालिदास हा उत्तम वैमानिक असला पाहिजे हे सिद्ध केले. या त्यांच्या कार्यासाठी उज्जैनच्या कालिदास अकादमीने त्यांचा मोठा सन्मान केला.

महाकवी कालिदास दिवसानिमित्त खास!

प्रतीक्षा शिवाची

‘प्रतीक्षा शिवाची – काशी– ज्ञानवापीच्या सत्याचा शोध’ – विक्रम संपत

या पुस्तकाच्या माध्यमातून विश्वेश्वर किंवा विश्वनाथाच्या रुपातील शिवाचा अधिवास असणाऱ्या काशीचा इतिहास, तिची प्राचीनता आणि पावित्र्याचे दर्शन घडते. जो या शहरात आपला देह ठेवतो त्याला मोक्ष मिळेल असे वचन प्रत्यक्ष शिव देतो. हे पुस्तक या स्वयंभू ज्योतिर्लिंग विश्वेश्वराच्या इतिहासाचा सखोल शोध घेते. आपल्या भक्तांचे आश्रयस्थान असलेले हे विश्वेश्वर मंदिर हे नेहमीच धर्मांध मूर्तीभंजकांच्या निशाण्यावर राहिलेले आहे. परंतु जेव्हा जेव्हा हे मंदिर उद्ध्वस्त करून त्याचे अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा हे मंदिर पुन्हा उभे राहिले आणि भरभराटीला आले. 

Shopping cart close