Timb (टिंब)

साहित्यिक आणि विचारवंत नरहर कुरुंदकर

साहित्यिक आणि विचारवंत नरहर कुरुंदकर (Narhar Kurundkar) – एक प्रसिद्ध लेखक, मराठी भाषा आणि साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून नरहरी कुरुंदकर यांनी ओळखलं जातं.

कुरुंदकरांवरचा मार्क्सवादाचा प्रभाव, तरीही त्यांची लोकशाहीवरील अढळ श्रद्धा या बाबी मी फारशा विचारात घेतल्या नाहीत. त्यांचे बिनतोड तर्क वापरुन काढलेले निष्कर्ष मला जास्त महत्त्वाचे वाटले. आजही वाटतात. विचारसरणी कुठलीही असो जर पुरावे पक्के असतील, युक्तीवाद भक्कम असेल तर समोर आलेलं सत्य कितीही कडवट असो मान्य करायला हवं हीच गोष्ट मी सर्वप्रथम कुरुंदकरांकडून शिकलो. माझ्या अनेक श्रद्धास्थानांना कुरुंदकरांच्या लिखाणामुळे धक्का बसला. काहीवेळा तो पचवणं जडही गेलं पण दुसरा इलाज नव्हता. कुरुंदकर प्रत्येक मुद्दा आपल्या असामान्य बुद्धीने क्ष किरणाप्रमाणे भेदूना आरपार विवेचन करतात तेव्हा त्यांनी काढलेल्या निष्कर्षाशिवाय दुसरा काही निष्कर्ष निघूच शकणार नाही असं वाटत राहतं.

The Anxious Generation

चिंता विकाराचा प्रसार । The Anxious Generation – Jonathan Haidt -निळू दामले

The Anxious Generation: How the Great Rewiring of Childhood Is Causing an Epidemic of Mental Illness –  Jonathan Haidt

आपलं कसं होणार याची चिंता माणसाला असते. सभोवतालची परिस्थिती इतकी अनुपकारक असते की आपल्याला अपयश येणार, धडक बसणार असं माणसाला पदोपदी वाटत असतं. आपण कमी पडतो असंही माणसाला वाटतं. असं सतत वाटत असण्यातून नैराश्य येतं.

या विकारानं ग्रासलेल्या माणसाची कार्यक्षमता कमी होते, माणसं कामातून जातात, ढिली होतात, ढिम्म होतात. आत्महत्याही करतात.

प्रस्तुत पुस्तक विचार करायला लावतं, आपल्याला चिंताग्रस्त करतं.

रामाच्या पदचिन्हांवरून पुष्पक विमानाने पंख पसरले

कालिदासाच्या मेघदूताचा हवाईमार्ग तपासणारे वैमानिक डॉ.भावे

रामाच्या पदचिन्हांवरून – मकरंद करंदीकर

पुण्यामधील डॉ.भावे हे अत्यंत निष्णात शल्यचिकित्सक !  मेघदूत आणि रघुवंश ही महाकाव्यांचा पूर्ण रसास्वाद घेण्यासाठी डॉ. भावे यांनी संस्कृतमध्येही पारंगत्व मिळविले. रघुवंशातील रामाच्या पदयात्रेच्या मार्ग प्रत्यक्ष शोधण्यासाठी जैन रामायणापासून ते बाली बेटातील रामायणापर्यंत वेगवेगळ्या १५० प्रकारच्या रामायणांचा शोध घेतला. 

कालिदासाने मेघदूतामध्ये वर्णन केलेल्या, नागपूरपासून हिमालयापर्यंतच्या हवाईमार्गाचे ( Navigation Log ) डॉ. भावे यांनी आपल्या विमानातून प्रत्यक्ष निरीक्षण करून त्याचे संपूर्ण छायाचित्रण केले. ज्यावेळी आकाशात उडण्याची कला नव्हती किंवा विमाने अस्तित्वात आली नव्हती असे जग मानते ( आपल्या पुराणकालात अद्ययावत विमानविद्या अस्तित्वात होती ) तेव्हा कालिदासाने हे संपूर्ण अवकाशवर्णन इतके अचूकपणे कसे केले असेल ? कालिदासाच्या त्या वर्णनाची अचूकता पाहून त्यांनी कालिदास हा उत्तम वैमानिक असला पाहिजे हे सिद्ध केले. या त्यांच्या कार्यासाठी उज्जैनच्या कालिदास अकादमीने त्यांचा मोठा सन्मान केला.

महाकवी कालिदास दिवसानिमित्त खास!

प्रतीक्षा शिवाची

‘प्रतीक्षा शिवाची – काशी– ज्ञानवापीच्या सत्याचा शोध’ – विक्रम संपत

या पुस्तकाच्या माध्यमातून विश्वेश्वर किंवा विश्वनाथाच्या रुपातील शिवाचा अधिवास असणाऱ्या काशीचा इतिहास, तिची प्राचीनता आणि पावित्र्याचे दर्शन घडते. जो या शहरात आपला देह ठेवतो त्याला मोक्ष मिळेल असे वचन प्रत्यक्ष शिव देतो. हे पुस्तक या स्वयंभू ज्योतिर्लिंग विश्वेश्वराच्या इतिहासाचा सखोल शोध घेते. आपल्या भक्तांचे आश्रयस्थान असलेले हे विश्वेश्वर मंदिर हे नेहमीच धर्मांध मूर्तीभंजकांच्या निशाण्यावर राहिलेले आहे. परंतु जेव्हा जेव्हा हे मंदिर उद्ध्वस्त करून त्याचे अस्तित्व पुसून टाकण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा हे मंदिर पुन्हा उभे राहिले आणि भरभराटीला आले. 

Butler to the World

Butler to the World : बटलर “घरगडी” ब्रिटन ….

पुस्तक ओळख : ब्रिटन आता सम्राट राहिला नसून बटलर झालाय.

लूटमारीच्या, चाचेगिरीच्या (कथित)साम्राज्याच्या जिवावर ब्रिटनमधे भव्य इमारती, म्युझियम, चर्चेस, पूल, पार्लमेंट इत्यादी उभं राहिलं. आता  स्थिती अशी आलीय की त्या गतवैभवाचा उपयोग पर्यटन स्थळं म्हणून करावा लागतोय.ब्रिटन जगभरच्या उद्योगींचा,दोन नंबरचे धंदे करणाऱ्यांचा बटलर झालाय. 

बटलर काय करतो? तो धन्याचं घर चालवतो. धन्याच्या गरजा भागवतो. घराची रंगरंगोटी करतो, बाग नीट ठेवतो, तळघरात मद्य भरपूर आहे की नाही ते पहातो, धनी खुष राहील याची व्यवस्था करतो.

Butler to the World: The Book the Oligarchs Don’t Want You to Read – How Britain Helps the World’s Worst People Launder Money, Commit Crimes, and Get Away with Anything

c

फायनान्शिअल अफेअर ऑफ द कॉमन मॅन

आपल्या समोर गुंतवणुकीचे परस्परविरोधी अनेक पर्याय असतात. दीर्घकालीन मुदतीत गुंतवणूक करावी की अल्पकालीन, जास्त जोखीम घेऊन अधिक परतावा मिळवावा की कमी जोखीम असलेला पण सुरक्षित पर्याय निवडावा? स्थावर मालमत्ता, समभाग, रोखे की मुदत ठेव?

पुस्तक : फायनान्शिअल अफेअर ऑफ द कॉमन मॅन  लेखक : अनिल लांबा पृष्ठ संख्या : १४३ 

मारुती चितमपल्ली पुस्तके

मारुती चितमपल्ली लिखित पुस्तके…

वानरांना येणाऱ्या दुष्काळाची माहिती आधीच होते. म्हणूनच वानरे खाल्लेली पाने, फळे, फुले यांचा चोथा जमा करून त्यात मध मिसळून त्याचे गोळे करून ठेवतात. हे तहान आणि भूकलाडू झाडाच्या ढोलीत ते पिलांसाठी तयार करून ठेवतात. 

‘उंदीर चोरीही करतात’ असं जर कुणाला सांगितलं तर विश्वास बसेल? 

हस्तिदंत नसलेल्या नर हत्तीला ‘मुकना हत्ती’ म्हणतात. हस्तिदंतांसाठी हत्तींची शिकार केली जाते हे मादी हत्तीच्या लक्षात आल्यानंतर त्यांना होणाऱ्या पिलांमध्ये ‘जेनेटिकली’ बदल घडून येऊ लागले.

आपण म्हणतो कोकिळा गाते, पण मादी कोकिळा गात नाही, तर नर कोकिळ गातो. 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

आठवणी अंगाराच्या – विश्वास विनायक सावरकर

एकूण सहा प्रकरणांतून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कुटुंबातील अन्य सदस्यांवर लिहिलेल्या या आठवणी आहेत. तसेच तात्या सावरकर यांची नात विदुला विश्वास सावरकर हिने आपल्या चौदाव्या वर्षी तात्यांच्या मे १९६३ ते फेब्रुवारी १९६६ या कालावधीतल्या काही आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्या आठवणी या पुस्तकात आहेत. तसेच काही छायाचित्रेही आहेत. याबरोबरच ‘आझाद हिंद सेने’ची प्रेरक शक्ती स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा जोडलेला परिशिष्ट वाचनीय आहे. १९८६ मध्ये जेव्हा या पुस्तकाची प्रथम आवृत्ती प्रकाशित झाली होती त्या वेळी अनेक वर्तमानपत्रांमध्ये या पुस्तकाबद्दल छापून आलेले अभिप्रायही दिलेले आहेत.

गेले लिहायचे राहून

गेले लिहायचे राहून

जनरल वैद्यांच्या खटल्यात जिंदा आणि सुखदेवसिंग यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यावर सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केलं. ऑक्टोबर १९९२च्या सुमारास मला निरोप आला, “आप को सुखदेवसिंगने मिलने को बुलाया है।” तोपर्यंत सुखा नावाचं प्रकरण वकील म्हणून आमच्या लेखी संपलं होतं. मला हा निरोप आल्यावर कळेना की मला त्याने असा निरोप का दिला असेल?

सुखदेवसिंगाची फाशी आणि त्याच्या वकिलाची संवेदनशीलता…

‘लंपन’ची गोष्ट

‘वनवास’- ‘लंपन’ची गोष्ट

लंप्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे, ‘एकदा नाही, दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी ह्या कथा मॅडसारख्या वाचल्या’ तरी’ त्या ताज्याच वाटतील. 

शाळकरी वयाचा ‘लंपन’ वर्षांनुवर्ष॑ मनात घर करूनबसला होता. पौगंडावस्थेतल्या मुलांचं जग त्या कथेतून एखाद्या सुंदर चित्रपटासारखं डोळ्यापुढून सरकून गेलं होतं. ज्या भाषेत ह्या ल॑प्यानं आपली ही शाळकरी वयातली कथा सांगितली होती ती बेळगावकडची मराठी होती. मराठीला कानडी चाल लावलेली. त्या चालीवरचं मराठी बोलणं अतिशय लोभस – अतिशय आर्जवी. एखाद्या गाण्यासारखं मनात रुंजी घालणारं. सत्यकथेत तीस वर्षांपूवी प्रसिद्ध झालेली ही कथा आजही तितकीच टवटवीत राहिली आहे, ज्या उत्सुकतेने आणि आनंदानं मी ती त्या काळी वाचली तितक्याच उत्सुकतेनं आणि आनंदानं प्रकाशने तीस वर्षांच्या मौनानंतर लिहिलेल्या आणि ह्या संग्रहात आलेल्या ल॑पनच्या  ‘कथा वाचल्या. पौगंडदशेतल्या छोट्या छोट्या अनुभवांच्या मार्मिक तपशिलानं जिवंत केलेल्या ह्या कथा आहेत. बाळगोपाळांच्या चिमुकल्या दुनियेचं प्रकाशने घडवलेलं हे दर्शन अपूर्व आहे.

– पु. ल. देशपांडे 

Shopping cart close