Timb (टिंब)

Bibliophobia: The End and the Beginning of the Book

पुस्तकं पाच हजार वर्षं टिकली की! – Nilu damle

Bibliophobia: The End and the Beginning of the Book  – Brian Cummings. 

पुस्तकांची भीती/तिरस्कार हा प्रस्तुत पुस्तकाचा विषय आहे. माणूस पुस्तकांचा तिरस्कार करतो आणि पुस्तकावर प्रेमही करतो हे सांगता सांगता लेखक पुस्तक निर्मितीचा दीर्घ इतिहास या पुस्तकात चितारतो. 

पुस्तक ही एक वस्तू असते तसंच ती एक कल्पनाही आहे असा लेखकाचा सिद्धांत आहे.  

पुस्तक जाळा, पुरा, नदीत बुडवा, काहीही करा. 

पुस्तक टिकतं.

अभंग नदीत बुडवले. तरीही टिकले.


वाचाल तर वाचाल! नियमित पुस्तक वाचण्याचे ‘हे’ लाभ तुम्हाला माहित आहे का?

Benefits Of Reading Books

रोज पुस्तक वाचण्याचे अनेक लाभ आहेत. ही गोष्ट तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे. वाचनाने ज्ञान वाढते आणि तुमचा दृष्टीकोन सुधारतो. पुस्तके वाचणे कसे लाभादायी आहे ते जाणून घेऊयात.

असं म्हटलं  जातं की  “ The Person who dont read, has no advantage over the person who can’t read.” म्हणजेच जो व्यक्ती वाचन करीत नाही तो वाचता न येणाऱ्या अशिक्षित माणसासारखाच आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या संधी गमावत असतो. 

गोपाळ नीलकंठ दांडेकर (गोनीदा)

गोपाळ नीलकंठ दांडेकर हे एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. .तसेच गो.नी.दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते.

परीचितांमध्ये अप्पासाहेब आणि रसिक वाचकांचे गोनीदा, आपल्या बहुढंगी अयुष्याचे वेगवेगळे पदर अपल्या कथा- कादंबर्‍यांमधुन मांडणारे म्हणुन सुपरिचीत; इतिहास अभ्यासक, चळवळे कार्यकर्ते, अध्यात्मिक संशोधक, भटके निसर्ग प्रेमी अशा कित्येक गोष्टी-छंदांमुळे समृद्ध जीवन जगलेले आणि तेच वाचकांपुढे ससाळ आणि सुंदर शैलीत मांडणारे ग़ोनिदा वाचकांना नेहमीच भुरळ घालतात.

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

औपचारिक शिक्षण फारसे-मॅट्रिक-पर्यंतही-झाले नाही. तथापि स्वप्रयत्नाने वाङ्‌मयाचा व्यासंग केला.माणदेशी माणसे (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला, त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी साहित्याला अनोखे होते. अद्‌भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला. 

ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. बनगरवाडी (१९५५), वावटळ (१९६४), पुढचं पाऊल (१९५०), कोवळ दिवस (१९७९), करुणाष्टक (१९८२) आणि सत्तांतर (१९८२) ह्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. 

रानोमाळ स्वच्छंद भ्रमंती करणारे निसर्गप्रेमी, शिकारी तसेच चित्रकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे. चित्रकलेचे कसलेही औपचारिक शिक्षण नसताना त्यांनी ही कला प्राप्त केली जागतिक कीर्तीच्या चित्रकारांच्या चित्रशैलीचा रसिकतेने शोध घेतला. त्यांची अनेक सुंदर रेखाटने प्रसिद्ध झालेली आहेत. आकाशवाणीवर ते दीर्घकाळ (१९५५–८५) नोकरीत होते.

[email protected]

श्री.ना. पेंडसे – श्रीपाद नारायण पेंडसे

आपल्या कथा कादंबऱ्यांतून कोकणातील विश्व आणि लोकजीवन चितारणाऱ्या श्री.नां. नी नंतर महानगरीय अनुभवही तितक्याच ताकदीने आपल्या कादंबऱ्यांतून व्यक्त केले. श्री.नां. यांच्या कादंबरीने एक नवी वाट चोखाळली. मराठीत  कादंबरीची नवी शाखा, नवी प्रकृती त्यांच्या कादंबऱ्यांपासून रूढ झाली.

[email protected]

एस. एल. भैरप्पा

अर्धशतकाहून अधिक काळ तेवीस कादंबर्‍या आणि आश्चर्यकारकपणे प्रामाणिक आत्मचरित्र लिहीणारा साहित्यिक,  भारतातील सर्वाधिक अनुवादित कादंबरीकार म्हणून,  साहित्य, सौंदर्यशास्त्र, तत्वज्ञान आणि संगीत यांचा अप्रतिम संगम काल्पनिक कथानकात  करणारा अभ्यासू म्हणून; अनंत प्रकारे करता येऊ शकते. 

Unveiling the Ultimate Book Lover’s Haven: Timb.in Online Multivendor Marketplace

Have you ever dreamt of a place where every bookish desire is fulfilled, where bookshelves stretch as far as the eye can see, and where a simple search opens doors to countless literary treasures? Well, welcome to the enchanting world of Timb.in! Here, we’re diving into a virtual universe where the aroma of well-worn pages mingles with the thrill of discovery. Whether you’re a book collector, an occasional reader, or a self-proclaimed bibliophile, this is your paradise.

पुस्तके का वाचावी?

लिखित शब्द संचिताचे सार –  पुस्तके

पुस्तके वाचणे ही एक अमुल्य आणि समृद्ध  करणारी गोष्ट आहे जी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे.

काळ कितीही बदलला तरीही ‘वाचन’ हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे..

मग ते पोथी असो,पुस्तक असो वृत्तपत्र असो की मासिक असो..

विद्वत्त्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन । स्वदेशे पूज्यते राजा विद्वान् सर्वत्र पूज्यते ॥

ज्ञानी माणसाचा सर्वत्र उदो उदो होतो आणि ज्ञान मिळवायचं असेल तर वाचन, मनन, चिंतन हवंच.

संकटग्रस्त ग्रंथालयं

ग्रंथालयं कमी होत आहेत?

वाचक ग्रंथालयात जातात किंवा जात होते कारण तिथं संदर्भ ग्रंथ उपलब्ध होतात. 

ग्रंथालयांची गरज ही वाचन संस्कृती वाढवणं आणि टिकवणं यासाठी आहे. वाचन हा संस्कार आहे आणि तो घडवायचा असेल तर ग्रंथालयांची भूमिका अनन्यसाधारण आहे, पण त्याबरोबरच ग्रंथालयांनी देखील काळानुरुप सातत्याने बदलण्याचं आव्हान देखील आमच्यासमोर आहे, असं पेडगावकर सांगतात.

भाऊ पाध्ये (Bhau Padhye)

भाऊंची ओळख

भाऊ पाध्ये यांचं पूर्ण नाव प्रभाकर नारायण पाध्ये. त्यांचा जन्म दादर येथे २९ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. मुंबई विद्यापीठातून १९४८ साली त्यांनी अर्थशास्त्र घेऊन पदवी मिळवली. १९४९ ते ५१ या काळात ते कामगार संघटनेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते होते. नंतर किंग जॉर्ज हायस्कूल (दादर), एल कदूरी हायस्कूल (माझगाव) आणि बी. एस. इझिकेल हायस्कूल (सँडहर्स्ट रोड), येथे प्रत्येकी एक वर्ष शिक्षकाची नोकरी केली. पुढे स्प्रिंग मिल (वडाळा) येथे ४ वर्षं आणि आयुर्विमा महामंडळ येथे ४ महिने कारकुनी केली. १९५६ साली शोशन्ना माझगावकर या कामगार संघटनेच्या कार्यकर्तीशी लग्न. ‘हिंद मझदूर’, ‘नवाकाळ’ (१ वर्ष), ‘नवशक्ति’ (११ वर्षं) या नियतकालिकांतून पत्रकारिता. ‘नवशक्ती’ सोडल्यावर काही काळ ‘झूम’ या सिने-साप्ताहिकाचे संपादन. ‘रहस्यरंजन’, ‘अभिरुची’, ‘माणूस’, ‘सोबत’, ‘दिनांक’, ‘क्रीडांगण’, ‘चंद्रयुग’ या नियतकालिकांतून स्तंभलेखन. १९८९पासून अर्धांगाच्या आघाताने लेखन अशक्य झालं.

मृत्यू- ३० ऑक्टोबर १९९६

Shopping cart close