• -100% क्रांतिसुक्ते: राजेर्षी छत्रपती शाहू

    क्रांतिसुक्ते: राजेर्षी छत्रपती शाहू

    0

    क्रांतिसूक्ते: राजर्षी शाहू छत्रपतींच्या भाषणांचा टिपा-टिप्पणीसह चिकित्सक अभ्यास

    राजर्षींच्या या ‘क्रांतिसूक्ता’ स आजच्या स्वातंत्र्योत्तर काळातील संदर्भ काय, याचाही विचार केला पाहिजे. महाराजांनी ज्यासाठी निर्धाराने झुंज दिली त्या गोष्टी आज पूर्णांशाने साकार झालेल्या नसल्या तरी त्या दिशेने फार मोठी प्रगती झाले आहे हे नाकारता येणार नाही. बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार वेगाने होत आहे. त्यामधील अनेक कर्तृत्वसंपन्न व्यक्ती राजकारणापासून शिक्षणापर्यंतच्या सर्व क्षेत्रांत आपल्या कृतीधृतीने चमकत आहेत. तथापि आपला समाज एकरस आणि एकजीव व्हावा हे राजर्षींचे स्वप्न तेवढ्या प्रमाणात साकार व्हायचे आहे. वाट मोठी आहे; हिमतीने चाल जरूर आहे. राजर्षी आहू छत्रपतीना अभिप्रेत असळेली सर्वकष क्रांती पूर्णत्वाने अजून व्हायची आहे. ‘श्रीशाय जनतात्मने’ ची प्रकर्षाने वानवा आहे. याचे तात्पर्य काय ते एवढेच आहे.

    प्रस्तुत संग्रहात डॉ. भोसले यांनी राजर्षींची मराठी भाषणे तेवढी संगृहीत केली आहेत. राजर्षींच्या इंग्रजी भाषणांचा वेगळा संग्रह  A Royal Philosopher Speaks  या सुरेख मथळ्याने सिद्ध झाला आहे. प्रा. भोसले यांनी ‘क्रान्तिसूक्ते’ मध्ये राजर्षींची मराठी भाषणे विषयवार विभागणी करून ती छापली आहेत. डॉ. भोसले यांनी परिश्रमपूर्वक तयार केलेले “टिपा आणि टिप्पणी’ हे सदर आजच्या अभ्यासकांना फार उपयुक्त होईल. त्यावरून डॉ. भोसले यांच्या संपादनकुडालतेची उत्तम साक्ष पटते. या कार्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. राजर्षींच्या भाषणांचा असा हा सुंदर संग्रह सर्वांच्या आदरास पात्र होईल यात शंका नाही.

    नागपूर वि. भि कोलते

    Digital Book

    Original price was: ₹175.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart
  • -100%

    छत्रपती शिवाजी महाराज – डॉ.प्र.न.देशपांडे

    0

    निवेदन

    लोकोत्तर व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घेण्याचा कितीही प्रयत्न केला तरी तो कधीही पुरेसा आणि समाधानकारक असत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे अशा व्यक्तींपैकी एक होते.

    शिवाजी महाराजांचे जीवन, त्यांनी घडविलेला इतिहास हा केवळ मराठी भाषा असलेल्या अभ्यासकांचा-सृजनशील लेखकांच्या लेखनाचा विषय झालेला नाही तर इतर भारतीय भाषांतील अभ्यासकांच्या, लेखकांच्या लेखनाचा विषय झालेला आहे.

    अशा या लोकोत्तर पुरुषाच्या जीवनाचा व त्यांनी घडविलेल्या इतिहासाचा मोजक्या पण नेमक्या  शब्दांत परिचय व्हावा म्हणून श्रीशिवाजी महाराजांवर एक छोटेखानी चरित्रग्रंथ लिहून देण्याची विनंती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने डॉ. प्र. न. देशपांडे यांना केली. “शिवाजी महाराजांनी शासनात शिस्तबद्धता निर्माण केली; न्यायदानात निःस्पृहता दर्शविली; गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱयांना मुलाहिजा न ठेवता समज दिली; पश्चात्तापदग्ध होऊन परतलेल्या वतनदारांना अभयदान दिले; सर्व धर्माना समान लेखले; साधुसंतांचा यथोचित आदर केला; परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आढळते, ती म्हणजे रयतेची काळजी. रयतेला लेकरांप्रमाणे मानणारा हा राजा केवळ महान युगपुरुष नव्हता तर मानवतेचे उत्कट तत्त्वज्ञान सांगणाऱ्या व आचरणाऱया महात्म्याप्रमाणे तो वंदनीय थोर पुरुष होता.” हा या चरित्रग्रंथाचा डॉ. प्र. न. देशपांडे यांनी केलेला समारोप वाचल्यानंतर त्यांनी आमची विनंती सन्मानित केल्याचे स्पष्ट होते. डॉ. प्र. न. देशपांडे यांचे आम्ही आभारी आहोत.

    – रा. रं. बोराडे

    मुंबई अध्यक्ष

    दि. १६ जुलै, २००२ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

    Digital Book

    Original price was: ₹45.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart
  • -100% महात्मा-गांधी-रविंद्रनाथ-ठाकुर

    महात्मा गांधी…रविंद्रनाथ ठाकुर

    0

    गुरूदेव रवीन्द्रनाथ ठाकुर (टागोर) यांच्या चिंतनामधून महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलू आणि वैशिष्ट्यांबद्दल आपणांस माहिती मिळते. हा एक वेगळा आणि मनस्वी अनुभव आहे. रवीन्द्रनाथांसारख्या श्रेष्ठ साहित्यिकांकडून महात्मा गांधींसारख्या श्रेष्ठ व्यक्तीबद्दल व्यक्‍त झालेले चिंतन हा भारतीय साहित्यसृष्टीचा अमोल ठेवा आहे.  मंडळाचा सुवर्णमहोत्सवाच्या प्रसंगी तो पुन्हा एकदा मराठी वाचकांसमोर ठेवताना मला अतिशय आनंद होत आहे. 

    रवीन्द्रनाथांसारख्या रसिक कविवर्याने महात्मा गांधींवर बंगालीत जे लिहीले आहे,  ते मराठीत प्रथमच प्रकाशित करण्याचा हा सुयोग. प्रा. वासुदेव विश्वनाथ गोखले यांचे संस्कृत, पाली, तिबेटी व बंगाली या भाषेवरील प्रभुत्व सर्वश्रुत आहे. त्यांनी करुन दिलेल्या ह्या भाषांतराचे ऋण न फिटणारे आहे.

    मधु मंगेश कर्णिक,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart
  • -100% महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग

    महाराष्ट्र महोदयाचा पूर्वरंग

    0

    महाराष्ट्रमहोदयाचा पूर्वरंग  

    श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेला मराठी भाषेचा पोशाख चढवून स्वतःबरोबरच भाविक प्राकृत जनांस अमृतानुभवाची वाट दाखवून समाधि घेतल्यावर लवकरच महाराष्ट्रसाम्राज्य लयास गेलें. परंतु बाह्यतः जरी हा मोठा फरक झाली तरी ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्रीयांच्या विचारस्वातंत्र्यास जें शुद्ध, सात्त्विक आणि ठळक वळण लावून दिलें तें कायमच झालें. ज्ञानेश्वरांचा समकालीन परंतु त्यांच्या मागें अर्धशतकावर जगलेला असा जो नामदेव, त्याला परधर्मी राजाचा काच सोसावा लागलाच. तात्पर्य काय, नामदेवापासून तों तहत तुकाराम-रामदासांपर्यंत अडीच-तीनशें वर्षांत पुढें होणाऱ्या यच्चयावत्‌ साधुसंतांस व त्यांच्या अनुयायांस आणि त्यांच्या समकालीन सर्व स्वधर्मनिष्ठ मराठ्यांस परधर्मी राजांचा आणि राजपुरुषांचा छळ सोसावा लागला. त्या सर्वांनी तो आपापल्यापरी ईश्वरावर श्रद्धा ठेवून सोसलाही; परंतु आपणांस हा सोसावा लागत असणारा जाच अन्नाय्य आहे; हे परकी लोक आपल्या देशांत केवळ शिरजोरपणाने घुसले आहेत; त्यांचा धर्म त्यांना जितका प्रिय आहे तितकाच आपला धर्म आपणांलाही प्रिय असला पाहिजे; ते जसे, ‘ईश्वराचे आपण लाडके भक्त असें मानितात; तसेच आपण मराठे लोकही ईश्वराचीं लाडकीं लेंकरेंच आहोंत; असें समजण्यास काय हरकत आहे? 

    ईश्वर न्यायी आहे; तो सर्वांवर सारखी दया करणारा आहे. त्याच्यापुढें हा मराठा, हा मुसलमान; पहिला नावडता, दुसरा आवडता असला भेद नाहीं. मात्र जो जसें कर्तव्य बजावील, जो जसा आपल्या धर्मास, आपल्या जन्मभूमीस, आपल्या देशबांधवांस ऐक्यानें भजेल, तसा तो, त्याची जन्मभू, त्याचे देशबांधव परस्परांस सुखप्रद होतील, व त्या सर्वांची एकतानता होऊन सर्वांचा सारखाच उद्धार होईल. त्यांच्यांतील परस्परमत्सरामुळें त्या सर्वांची झालेली, होत असलेली व पुढें होणारीही दैना दूर होईल आणि जगांतील इतर लोकांस व सदुदाहरण घालून देऊन वैभवाच्या शिखरावर सुखनिद्रा घेऊं शकतील. अजा प्रकारच्या सात्त्विक श्रद्धेनें, दैवी संपत्तीच्या लालसेनें, स्वदेश, स्वधर्म आणि सदाचार यांची उन्नति करणें, हेंच कर्तव्य समजून, सतत कायावाचामनें प्रयत्न करणारे महाराष्ट्रांतील आचांडाळब्राह्मण जातींतील सर्व सत्पुरुष कसे वागले आणि त्यांना व त्यांच्या स्वदेश, स्वधर्म आणि स्वजन या प्राणप्रिय त्रयीला परम श्रेयस्कर अशी उन्नति कशी प्राप्त झाली, हें दाखविण्याचा ह्या लेखाचा उद्देश आहे. म्हणजे श्रीमुकुंदज्ञानेश्वरांच्या परमामृत, अमृतानुभवानंतर दैवानें उलट खाल्यामुळे ‘न हिन्दुर्न यवनः’ असला प्रकार झाल्यावर श्रीसमर्थ रामदासांच्या दासबोधाची आवश्यकता कशी आली आणि तो बोध सार्थनाम कसा झाला हें दाखवावयाचें आहे.  

    वरील उद्देश तडीस नेण्यास अवइ्य असणारी विद्ठत्ता लेखकाला नाहीं; तथापि ‘प्रयत्नीं परमेश्वर’ ह्या वृद्धवचनावर भरंवसा ठेवून तो चालणार आहे. श्रीज्ञानेश्वरमुकुंदराजप्रभृति साधुसंतांच्या लेखांचा, तसाच बखरी, कागदपत्रें आणि राजवाडेप्रभृती स्वेतिहासशोधकांनीं उघडकीस आणलेल्या विविध माहितीचा शक्‍य तितका उपयोग करून हा लेख सजविण्याचा विचार आहे.  

    ह्यांत तेरावें चौदावें आणि पंधरावें ह्या तीन संबंध झ्तकांचा महाराष्ट्राचा धार्मिक, सामाजिक आणि राजकीय असा तिन्ही बाजूंचा संक्षिप्त इतिहास येणार आहे. तरी वाचकांनीं सावधान राहून ग्राह्य घ्यावें, त्याज्य टाकावें आणि अक्षम्य चुका असतील त्या पदरांत घालून त्या सुधारण्याचा मार्ग त्याला दाखवावा आणि परस्परांची समजूत पटवून ऐक्य साधण्याचा संकल्प करावा, एवढी विनंति करून स्वीकृत कार्यास आरंभ करितों. 

    Digital Book – PDF

    Original price was: ₹50.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart
  • -100%

    महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड भाग १ (शिवकाल)

    0

    शिवकाल (इ. स. १६३०—१७०७) 

    सिहावलोकन

    येथपर्यंत शिवशाही संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि राणी ताराबाई यांच्या कर्तृत्वाचे कथन उपलब्ध माहितीच्या आधाराने साधेल तेवढे सुसंगत केले आहे.

    शहाजी महाराज अभूतपूर्व प्रयोग आणि असामान्य कर्तृत्व करून परक्यांचे राज्य टिकविण्यासाठी झटले व नंतर स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आपल्या बापाच्या पराक्रमाच्या कथा आपल्या मातोश्रीकडून ऐकून बाल शिवरायांनी ठरविले की आपण आपले स्वतःचे राज्य उभार. ह्या विचारास वडील शहाजी महाराज, मातोश्री जिजाबाई, आणि इतर हितचिंतकांनी उचळून धरले. त्यावेळी शहाजी महाराज वडीलपुत्र संभाजीराजे यांसह बंगलोरास होते.

    त्याकरिता शहाजी महाराजांनी संभाजीराजे व शिवरायास दोन वर्षे बंगलोरात प्रशिक्षण देऊन त्यांना स्वराज्य स्थापण्यासाठी प्रखर ध्येयवादी बनविले. पुण्यास गेल्यावर बारा मावळातील लोकांच्या सुख-दुःखाशी समरस होऊन त्यांची मैत्री संपादन करणे व वतनदारांचा बंदोबस्त करणे ही दोन कामे शहाजी महाराजांनी शिवरायास सुचविली होती. 

    शिवरायांच्या बालपणी इस्लामी परधर्मीयांचे राज्य महाराष्ट्रात सर्वत्र होते. त्यावेळी हिंदू प्रजा सर्वार्थाने परदास्यात पिचत होती. हिंदूना बाटवून त्यांना इस्लाम धर्माची दीक्षा देणे, त्यांची मंदिरे, मूर्ती वगैरे श्रद्धास्थाने उद्‌ध्वस्त करणे, हिंदू स्रियांचे अपहरण इत्यादी अनेक अत्याचारांना मुस्लिम राज्यात हिंदू प्रजा तोंड देत होती. हे श्रिवरायांनी लहानपणी पाहिले आणि स्वजनांचे स्वतंत्र राज्य स्थापावयाचे ठरविले. त्याकरिता त्यांनी नियोजनपूर्वक साहसे केली. जीवन मरणाचे लढे दिले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करून आपणांस राज्याभिषेक करवून घेतला. परदास्यात पिळल्या जाणाऱ्या विस्कळीत अशा हिंदू समाजाची जमेल तेवढी एर्कोजूट करण्याचे महाराजांनी आपले धोरण ठरविले.

    “हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे” असे महाराज तत्कालीन देशपांडे व वतनदार वीर यांना आपल्या स्वराज्यसिद्धीच्या संकल्पनेत सामील करून घेण्यासाठी सांगत असत. यावरून त्यांच्या संकल्पनेस ईश्वराचे अधिष्ठान होते. इ. स. १६४६ त शिवरायांनी जी मुद्रा पत्रावर केली ती स्वतःच्या राज्याभिषेकानंतरही चाळू ठेवली होती. “प्रतिपचंद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता। शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते!” म्हणजे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे हळूहळू वाढणारी आणि विश्वाने वंदिलेली असून विश्वकल्याणासाठीच तिचे अस्तित्व आहे, ही मुद्रा त्यांनी संस्कृत भाषेत केली.

    शिवरायांनी परकीय राज्यकर्त्यांचे धार्मिक आणि राजकीय आक्रमण थांबून धरण्यासाठी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे हा एकच रामबाण तोडगा आहे, अज्ञी शिकवण तत्कालीन महाराष्ट्रीयांस दिली व स्वराज्याची स्थापना केली.

    स्वराज्य संपादनाचे काम चाळू असता महाराजांनी स्वराज्यातील ठिकठिकाणच्या साधूसंतांच्या भेटी घेतल्या. तसेच अनेक प्रसंगी मंदिरांना व मठांना मुद्दाम भेटी दिल्या. त्या काळात धार्मिक स्थाने ही जनतेची श्रद्धास्थाने होती. तिथल्या भेटीत तेथे जमणाऱ्या सामान्यजनांचा संपर्कही त्यांना साधता येत असे. शिवकालीन पत्रसारसंग्रहात ब्राह्मणास वर्षासने, अग्रदान, दान व इनाम दिल्याची अनेक पत्रे आहेत. त्यापैकी काही पत्रे सारांशरूपाने इथे दिली आहेत. इ. स. १६५३ मध्ये वेदमूर्ती गोपाळ भट यांनी मातोश्री जिजाबाईनना मंत्रोपदेश दिला. त्याबद्दल त्यांना वर्षासन व दानपत्र देण्यात आले. जुलै १६५३ त महाराजांनी सिद्धेश्वर भट यांना त्यांच्या अनुष्ठानबळे आपण राजाधिकारी जालो म्हणून वर्षासन दिले. १६५६ साली दोन काजींना तत्पूर्वी तुटलेली सनद चालू केली, हजरत पीराला इनामती शेतीची सनद दिली. तसेच १६७१ साली आळंदी येथील ज्ञानदेवाच्या मंदिरास इनाम दिले इ. स. १६७७ त चिंचवड देवस्थानातील अन्नखर्च भागविण्यासाठी वतन इनाम दिले. तिरुपती व चिपळूणजवळील परशुराम क्षेत्रास महाराजांनी वर्षासने दिली होती.

    Digital Book – PDF

    Original price was: ₹275.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart
  • -100%

    रायगडची जीवनकथा

    0

    पुस्तकाविषयी 

    “रायगडची जीवनकथा” या पुस्तकात रायगडवर घडलेला सर्वविध इतिहास साद्यंत देण्याचा प्रयत्न केला आहे. रायगडच्या इतिहासासंबंधाने आजवर जे संशोधन झाले, ते सर्व या पुस्तकात अंतर्भूत झाले आहे; तेवढ्यापुरते हे पुस्तक संकलनात्मक मानता येईल. पण रायगडच्या परिसरात हिंडून अनेक असंशोधित, अव्वल दर्जाचे कागद पाहून, नकळून घेऊन त्यांचा येथे प्रथमच उपयोग केला आहे. पेशवेदप्तरातून रायगडसंबंधीची बरीच माहिती येथे प्रथमच ग्रंथित केली आहे. श्रीभारत इतिहास संशोधन मंडळातील स. ग. जोशी-दप्तर, चंद्रचूड-दप्तर यांतील अप्रसिद्ध माहितीचा अंतर्भाव येथे केला आहे. अश्ञा तऱहेने प्रथमच पुढे येणारा मजकूर भरपूर असून त्याने या पुस्तकाची किमान दहा प्रकरणे सजविली आहेत; तेवढ्यापुरते हे पुस्तक संशोधनात्मक आहे. रायगडचा बराच अप्रसिद्ध इतिहास देऊन हे पुस्तक अद्ययावत्‌ केले आहे. पूर्वीच्या संशोधनातून निर्माण झालेले अपसमज दूर केले आहेत व अनेक संशोधित ऐतिहासिक पत्रांची मितिशुद्धि केली आहे. यायोगे, प्रस्तुत विषयातील वाचकांच्या ज्ञानात भरपूर भर पडेल, असा विश्वास वाटतो.

    रायगडचा इतिहास संशोधनपूर्वक लिहिणे हे राष्ट्रीय कर्तव्य-कर्म होते व ते ऋण फेडण्याचा लेखकाचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

    महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

    • पहिली आवृत्ती १९६२
    • दुसरी आवृत्ती १९७४
    • तिसरी आवृत्ती १९९५
    • चौथी आवृत्ती २००५
    • पाचवी आवृत्ती २००८

    Digital Book

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart
  • -100% हुतात्मा दामोदर हरि चाफेकर

    हुतात्मा दामोदर हरि चापेकर यांचे आत्मवृत्त

    0

    रॅन्डचा खून केल्यामुळे दामोदर हरि चापेकरांना फाशीची शिक्षा झाली असता ऑक्टोबर, १८९७ मध्ये येरवडा कारागृहात त्यांनी आपली सर्व हकिकत मोडीत लिहून ठेविली. श्री. वि. गो. खोबरेकर यांनी सदर मोडी हस्तलिखिताचे बालबोधीकरण व संपादन करून ते प्रकाशनासाठी मंडळाच्या स्वाधीन केले,  त्याकरीता मंडळ आभारी आहे. येरवडा कारागृहात असलेले हे मोडी बाड पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्याने मराठी वाचकास एका क्रांतिकारकाच्या मनाची तळमळ, त्यांनी आपल्या साध्याकरिता केलेली साधना याचा परिचय होईल आणि क्रातिकारकांवरील वाड़्मयात मोलाची भर पडली. 

    लक्ष्मणशास्त्री जोशी 

    २९ नोव्हेंबर, १९७४. अध्यक्ष.

    महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ, मुंबई ३२.

    कार्तिक शुक्ल १५, १८९६

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart