• -25%

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा ४

    0

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग ४ रक्तमुखी नीलम आणि इतर ६ कथा

    व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं.

    Original price was: ₹240.00.Current price is: ₹180.00.
    Add to cart
  • -25%

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा ३

    0

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग ३ साळिंदराचा काटा आणि इतर ३ कथा

    व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं.

    Original price was: ₹240.00.Current price is: ₹180.00.
    Add to cart
  • -25%

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा २

    0

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग २ मृत्युपत्रानेच घेतला बळी आणि इतर ३ कथा

    व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं.

    Original price was: ₹240.00.Current price is: ₹180.00.
    Add to cart
  • -25%

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा १

    0

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग १ प्राणीसंग्रहालय आणि चित्रचोर

    व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं.

    Original price was: ₹275.00.Current price is: ₹206.00.
    Add to cart
  • -25% Vyomkesh bakshi 4 books

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा संच (४)

    0

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग १ प्राणीसंग्रहालय आणि चित्रचोर

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग २ मृत्युपत्रानेच घेतला बळी आणि इतर ३ कथा

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग ३ साळिंदराचा काटा आणि इतर ३ कथा

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग ४ रक्तमुखी नीलम आणि इतर ६ कथा

    दूरदर्शनवर चोखंदळ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चाणाक्ष गुप्तहेर व्योमकेश बक्षी आता मराठीत… व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आहे. निखळ आनंद देणार्‍या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!

    Original price was: ₹995.00.Current price is: ₹750.00.
    Add to cart
  • -100% महात्मा-गांधी-रविंद्रनाथ-ठाकुर

    महात्मा गांधी…रविंद्रनाथ ठाकुर

    0

    गुरूदेव रवीन्द्रनाथ ठाकुर (टागोर) यांच्या चिंतनामधून महात्मा गांधी यांच्या व्यक्तिमत्वाच्या विविध पैलू आणि वैशिष्ट्यांबद्दल आपणांस माहिती मिळते. हा एक वेगळा आणि मनस्वी अनुभव आहे. रवीन्द्रनाथांसारख्या श्रेष्ठ साहित्यिकांकडून महात्मा गांधींसारख्या श्रेष्ठ व्यक्तीबद्दल व्यक्‍त झालेले चिंतन हा भारतीय साहित्यसृष्टीचा अमोल ठेवा आहे.  मंडळाचा सुवर्णमहोत्सवाच्या प्रसंगी तो पुन्हा एकदा मराठी वाचकांसमोर ठेवताना मला अतिशय आनंद होत आहे. 

    रवीन्द्रनाथांसारख्या रसिक कविवर्याने महात्मा गांधींवर बंगालीत जे लिहीले आहे,  ते मराठीत प्रथमच प्रकाशित करण्याचा हा सुयोग. प्रा. वासुदेव विश्वनाथ गोखले यांचे संस्कृत, पाली, तिबेटी व बंगाली या भाषेवरील प्रभुत्व सर्वश्रुत आहे. त्यांनी करुन दिलेल्या ह्या भाषांतराचे ऋण न फिटणारे आहे.

    मधु मंगेश कर्णिक,अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart
  • -100% हुतात्मा दामोदर हरि चाफेकर

    हुतात्मा दामोदर हरि चापेकर यांचे आत्मवृत्त

    0

    रॅन्डचा खून केल्यामुळे दामोदर हरि चापेकरांना फाशीची शिक्षा झाली असता ऑक्टोबर, १८९७ मध्ये येरवडा कारागृहात त्यांनी आपली सर्व हकिकत मोडीत लिहून ठेविली. श्री. वि. गो. खोबरेकर यांनी सदर मोडी हस्तलिखिताचे बालबोधीकरण व संपादन करून ते प्रकाशनासाठी मंडळाच्या स्वाधीन केले,  त्याकरीता मंडळ आभारी आहे. येरवडा कारागृहात असलेले हे मोडी बाड पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्याने मराठी वाचकास एका क्रांतिकारकाच्या मनाची तळमळ, त्यांनी आपल्या साध्याकरिता केलेली साधना याचा परिचय होईल आणि क्रातिकारकांवरील वाड़्मयात मोलाची भर पडली. 

    लक्ष्मणशास्त्री जोशी 

    २९ नोव्हेंबर, १९७४. अध्यक्ष.

    महाराष्ट्र राज्य साहित्य-संस्कृति मंडळ, मुंबई ३२.

    कार्तिक शुक्ल १५, १८९६

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart
  • -100%

    पूज्य स्वामी रामानंदतीर्थ यांची दैनंदिनी

    0

    पी. व्ही. नरसिंह राव , 9, Motilal Nehru Marg,

    P. V. Narsimha Rao New Delhi 110011

    दिनांक : १ फेब्रुवारी २०००.

    श्री. वि. पां. देऊळगावकर यांनी संपादित केलेली “पू. स्वामी रामानंदतीर्थ यांची दैनंदिनी” स्वामीजींच्या विचारांचा, प्रगल्भ चिंतनाचा अमूल्य ठेवा आहे. या दैनंदिनीत स्वामीजींच्या शालीन व अष्टपैलू

    व्यक्तिमत्त्वाचा, खंबीर नेतृत्त्वाचा, त्यांच्या अंतरंगाचा आणि प्रामुख्याने निःस्वार्थ बुद्धीने, देशप्रेमाने प्रेरित होऊन केलेल्या विविध कार्याचा आढावा आहे. म्हणूनच ही दैनंदिनी वाचकांना उच्च विचारसरणीसाठी

    प्रेरणादायी तर ठरेलच, परंतु तरुण पिढीत, नवयुवकांत समर्पणाची भावना निर्माण करून त्यांच्यात परिवर्तन घडवून आणू शकेल याची मला खात्री आहे.

    – दिनांक १ फेब्रुवारी २०००. पी. व्ही. नरसिह राव

    Original price was: ₹60.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart
  • -100% साने गुरुजी

    सेनानी साने गुरुजी

    0

    कोकणातला निसर्ग आणि खानदेशची माती व माणसे यांच्यावर गुरुजींनी निरतिशय प्रेम केले.

    अंतरीच्या उमाळ्याने गुरुजींनी लेखणीचा वापर केला त्याच उमाळ्याने त्यांनी आपली वाणीही वापरली. लेखणी आणि वाणी ही त्यांना त्यांच्या कार्यसिद्धीसाठी लाभलेली अमोघ अशी वरदानेच होती. ‘हा माणूस आपले जीवन, आपली सुखदुःखे, आपल्याच भाषेत, आपल्यापाशी तादात्म्य पावून अपरंपार सहानुभूतीने रंगवतो आहे’ असेच त्यांना भावले.

    याच उमाळ्याने शिक्षणाच्या क्षेत्रातही गुरुजी वावरले. ‘गुरुजी’ हे बिरुद त्यांच्याइतके महाराष्ट्रात अन्य कुणीही सार्थ केलेले नाही. तसे अंमळनेरच्या शाळेत श्रिक्षक म्हणून ते पाच-सहा वर्षेच होते. पण शाळेच्या चिमण्या जगाचा निरोप घेऊन राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतल्यावरसुद्धा त्यांनी आपली शिक्षकाची भूमिका कधी सोडली नव्हती. समाजशिक्षणाचे कार्य अनेक अंगांनी ते सतत करीतच राहिले आणि महाराष्ट्राचे गुरुजी बनले.

    साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वाचा पिंड हा श्रद्धाशील समर्पणवृत्तीच्या प्रेमळ अशा आर्त भक्ताचाच होता. त्यांनी मानवावर आणि मानवेतर सुष्टीवरही अपार प्रेम केले. प्रेमधर्माचे ते यात्रिकच होते. ‘खरा तो एकचि धर्म । जगाला प्रेम अर्पावे’ ह्या तर्‍हेच्या प्रेमधर्माची पताका त्यांनी आयुष्यभर फडकवत ठेवली. गुरुजींनी आपल्या वागणुकीतून, शिकवणुकीतून सर्वत्र प्रेमधर्माची शिकवण दिली. प्रेमाच्या फडाचे ते फडकरीच होते. प्रेमाच्या दिडीचे ते दिडीकरच होते.

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart
  • -100% बालगंधर्व

    एक होता गंधर्व

    0

    एक होता गंधर्व

    – निवेदन – 

    “एक होता गँधर्व”ही आहे बालगंधर्वाची जीवनकथा. 

    नागपूरचे डॉ. राम म्हैसाळकर यांनी लिहिलेली .

    जिव्हाळ्याने ओतप्रोत भरलेली.

    मधमाशांच्या मधानं लदलदलेल्या पोळाप्रमाणं.

    बालगंधर्वाच्या आयुष्यातले चढउतार शब्दबद्ध करणारी.

    बालगंधर्वाचा आयुष्यपट उलगडून दाखविता दाखविता तत्कालीन कालपट उलगडून दाखविणारी.

    या कालपटातला संगीताच्या क्षेत्रातला वैभवकाळ चित्रीत करणारी.

    मराठी नाट्याच्या व संगीताच्या रसिकांना अनमोल खजिना उपलब्ध करून देणारी.

    भीज पाऊस मनोहर आहे असं नुसतं म्हणायचं नसतं.

    या भीजपावसात मनसोक्त भिजायचं असतं.

    चला, येताय ना भिजायला.

    रा. रं. बोराडे,  अध्यक्ष,  महाराष्ट्र राज्य साहित्य आणिसंस्कृती मंडळ 

    दिनांक : २०-९-२००१

    Digital Book

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart
  • -100% Dhondo keshav karve

    महर्षी धोंडो केशव कर्वे

    0

    अण्णासाहेबांना खंत होती, ती ही की स्वातंत्र्यानंतर समता आलेली नाही. समता आल्याशिवाय स्वातंत्र्याची खरी गोडी चाखता येणार नाही, असे ते म्हणत. महर्षी कर्वे यांनी कधीही तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला नाही किंवा लोकांना कोणता उपदेश केला नाही. कर्वे यांचे कार्य हाच कर्वे यांचा संदेश होता. ‘आकाशावर नेम धर म्हणजे तुझा बाण झाडापर्यंत तरी जाईल’ या वचनाप्रमाणे कर्वे कार्य करीत राहिले.

    कर्वे यांच्या थोरवीबद्दळ आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे. ‘मी कोण आहे’ असा प्रश्न त्यांनी स्वतःलाच विचारला आणि त्याचे वस्तुनिष्ठ उत्तर स्वतःच शोधून काढले. म्हणूनच ते म्हणतात-“मी समाजकार्याला सर्वस्वी वाहून घेतले नाही. संसारी माणूस व संन्यासी वा त्यागी माणूस या दोघांच्या मधला मार्ग मी स्वीकारला. मी संसार नेटका केला नाही. कसाबसा करीत राहिलो. अजूनही करीत आहे. कुटुंबासाठी घरदार किंवा द्रव्यसंचय मी केला नाही. जरुरीपुरतेच वैयक्तिक व कौटुंबिक स्वार्थाकडे लक्ष देऊन बाकीचे सामर्थ्य व उर्वरित द्रव्य लोकहिताच्या कामी खर्चणे हा माझा स्वभाव बनला आहे.”स्वतः विषयीची वस्तुनिष्ठ जाणीव व स्वतःचे यथार्थ मूल्यमापन थोड्याच लोकांना करता आले. महर्षी कर्वे यांनी असे मूल्यमापन स्वतः केले.

    धर्म, नीतिशास्र आणि तत्त्वज्ञान यासंबंधी त्यांचे विचार पुरोगामी होते. त्यांचे सर्व आचरण धर्माधारित होते. हा धर्म कोणता? सद्‌विचारधर्म. अण्णासाहेबांनी धर्मविचारात आणि कर्माचरणात कर्मकांडाळा कधीच स्थान दिले नाही. त्यांचा मानसिक पिंड एखाद्या संन्याशासारखा अविचल आणि निर्विकार होता. 

    Original price was: ₹35.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart
  • -100% तंट्या-भिल्ल

    जननायक तंट्या भिल्ल

    0

    एकशे  पंचवीस वर्षापूर्वी आपल्याकडे इंग्रजांचा अंमल होता. आजच्या जळगाव-धुळे जिल्ह्यांस त्या काळात खानदेश म्हणत. खानदेझ्ञाला लागून वरच्या बाजूने सातपुडा डोंगराची रांग आहे. याला लागून होळकरांचा पश्चिम निमाड आणि शिद्यांचा पूर्व निमाड हे भाग होते. खानदेश, होळकरांचा पश्चिम निमाड आणि शिद्यांचा पूर्व निमाडची हद्द जळगाव जिल्ह्यातील पालजवळ मिळत होती. त्या भागात तंट्या भिल्लाचे गाव होते. माउंटअबूपासून सुरू होणारा विध्य, सातपुडा आणि बस्तरपर्यंतच्या डोंगराळ भागात आदिवासींची मोठी वस्ती आहे. यातच भिल्लांची मोठी संख्या आहे.

    मराठेझाहीचा १८१८ साली अस्त झाला. परंतु त्या काळात सातपुडातील बहादुर भिल्लांनी अनेक वर्षे गनिमी काव्यानं इंग्रजांशी झुंज दिली. सातपुडा, सातमाळा, अजिंठ्याच्या डोंगरांतील अनेक भिल्ल नायकांनी इंग्रजांशी प्रखर लढा दिला. ह्यात सातमाळातील भागोजी नाईक, सातपुडातील कजरसिंग नाईक, भिमा नाईक आणि तंट्या भिल्लाचा संघर्ष भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील काही सोनेरी पाने आहेत.

    भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाप्रमाणेच या आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहासही महत्त्वाचा  आहे. बलाढ्य ब्रिटिझञ सत्तेला अकरा वर्ष सळो की पळो करणारा तंट्या भिल्ल हा

    ज्या काळात होळकर, निजाम, झिंदे अन्‌ इतर संस्थानिक ब्रिटिझ सत्तेची हुजरेगिरी करण्यात मशगुल होते, त्या काळात हा लोकविलक्षण नायक जनाधारावर झुंजत होता. अकरा वर्ष ब्रिटिश सत्तेच्या तोंडचे पाणी तंट्याने पळविले. त्याची एकाकी झुंज आदिवासी स्वातंत्र्यलढ्यातील एक सोनेरी पान आहे. 

    Digital Book

    Original price was: ₹45.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart