• Placeholder

    महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढे (इ.स.१८१८ – १८८४)

    0

    संक्षिप्त प्रस्तावना 

    विषयावरील प्रसिद्ध व अप्रसिद्ध साधनांची माहिती अभ्यासुंसाठी देत आहे. महाराष्ट्रारात इंग्रजी सत्ता आल्यानंतर म्हणजे १८१८ पासून १८८५ पर्यंत ठिकठिकाणी सशस्त्र लढे झाले. त्यांत १८५७ चा लढा सर्वांत मोठा होता. त्या अगोदर खानदेशातील भिल्ल, पुणेसाताऱ्याकडील रामोशी यांच्या ७/८ वर्षे सतत चाललेल्या लढ्यांनी इंग्रजांना त्रस्त केले. कित्तुरचे बंड, सावंतवाडी, कोल्हापूर येथील गडकऱ्यांचे लढे हेही सशस्त्र होते. ब्रिटीशांनी हेही लढे वेळीच निपटून काढले. १८५७ साली कोल्हापूर, सातारा, मुंबई, नागपूर, खानदेश, नाशिक, औरंगाबाद, जमखिंडी, सुरपूर या ठिकाणी सशस्त्र लढे झाले. तेथील एतद्देशिय सैनिकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध हे सशस्त्र लढे केले. ह्या लढ्यांच्या इतिहासाची साधने शोधून प्रसिद्ध करण्यासाठी त्यावेळचे केंद्रिय शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांच्या आध्यक्षतेखाली इतिहास तज्ञांची एक समिती नेमली होती. त्या समितीकडे १८५७ च्या इतिहासाच्या लेखणाचे काम सोपविण्यात आले, तसेच केंद्रशासनाने मुबंई, मध्येप्रदेश, उत्तरप्रदेश, पंजाब इत्यादी सर्व राज्यांना राज्यस्तरीय इतिहास समित्या नेमण्यास सांगितले. त्याप्रमाणे प्रत्येक राज्याने इतिहास समित्या नेमल्या. त्यावेळच्या मुंबई सरकारने जी इतिहास समिती नेमली होती त्या समितीने मुंबई दप्तरखान्यातील ह्या विषयावरील कागदपत्रे तपासून “सोर्स मटिरियल फॉर द हिस्टरी ऑफ फ्रीडम मोव्हमेंट इन इंडिया”नावाचा १८१८ ते १८८५ या कालखंडातील अप्रसिद्ध कागदपत्रांचा खंड प्रसिद्ध केला. ही सर्व कागदपत्रे पूर्वी कॉन्फीडेन्सीयल म्हणजे गुप्त होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर शासनाने त्यांची गुप्तता काढून टाकली. या रेकॉर्डमधून सरकारी दप्तरखान्यातील हस्तलिखित ग्रंथ विशेषतः पोलिटिकल डिपार्टमेंटचे व्हॉल्यूम्स तसेच पुणे येथील दप्तरखान्यातील पत्रव्यव्हार ही निरनिराळ्या वेळच्या लढेाची माहिती पुरवितात.  नागपूर लढ्याच्या माहितीसाठी श्री. या. मा. काळे यांचा नागपूर प्रांताचा इतिहास व वऱ्हाड प्रांताचा इतिहास तसेच नागपूर रेसिडेन्सी कॉरस्पॉडन्स्‌ भाग ३ हे उपयोगी आहेत.  इनाम कमिशन स्थापून इंग्रज सरकारने इनामदारास कसे लुबाडले याची माहिती “मुंबई इलाख्यातील इनाम कमिशन खात्यातील गैर इन्साफ”या सन १८५९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांत मिळते. लोकहितवादींचे लेखसंग्रहही या बाबतीत खूप माहिती देतात. 

    महाराष्ट्रातील व्यापर धंदे इंग्रजांनी कसे नष्ट केले या संबंधीची माहिती पुणे येथील डेक्कन कमिशनर्स रेकॉर्डस्‌, सिलेक्शन ऑफ पेपर्स फ्रॉम द रेकॉर्डस ऑफ इंडिया हाऊस, व्हॉ. ३, ४, १८३१- ३२ चे पार्लमेंटरी पेपर्स चॅप्लीन व एल्‌ फिन्स्टनचे रिपोटर्स, मुजुमदारकृत पेशवाईनंतरचा पुण्याचा इतिहास इत्यादी प्रसिद्ध अप्रसिद्ध साधने देतात. 

    भिल्लांनी १८१८ ते १८३१ पर्यंत सशस्त्र उठाव करून ब्रिटीशांना हैराण केले होते. कित्तूरच्या उठावाची माहिती १८२४ ते १८३० या कालखंडातील पोलिटिकल डिपार्टमेंटचे व्हॉल्यूमस्‌ देतात. रामोजी  पुणे- सातारा जिल्याह्यातील रामोशांनी १८२४ ते १८३१ पर्यंत इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करून इंग्रजांस जेरीस आणले. रामोशांच्या बंडातील प्रमुख उमाजी नाईक यास ज्या कॅ्टन मॅकिन्टॉशने पकडले त्याने रामोशांचा इतिहास इंग्रजीमध्ये लिहून ठेवलेला आहे. तसेच त्या त्या वर्षीच्या पॉलिटिकल डिपार्टमेंटच्या व्हॉल्यूममध्ये या रामोशांच्या ठिकठिकाणच्या उठावांची माहिती सापडते. सावंतवाडी व कोल्हापूर येथील गडकऱ्यांनी केलेल्या उठावांची माहिती त्या त्या वर्षीच्या पोलिटिकल डिपार्टमेंटच्या व्हॉल्यूममध्ये तसेच कोल्हापूर व पुणे येथील दप्तरखान्यात सापडते.  १८५७ मध्ये महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर, मुंबई, नागपूर व इतर ठिकाणी एतद्देशीय सैनिकांनी जे सहस्त्र उठाव केले त्याची माहिती मुंबई दप्तरखान्यातील पोलिटिकल डिपार्टमेंट व्हॉल्यूममध्ये सापडते.  

    १८५७ च्या अयशस्वी उठावानंतर महाराष्ट्रात दोन दशके सर्वत्र सामसुम झाल्यासारखे वटले. पण  दुष्काळ आणि साथीचे रोग यांनी थेमान घातल्यामुळे वासुदेव बळवंत फडके आणि त्यांचे शुर रामोशी सहकारी यांनी १८७९ मध्ये सशस्र उठाव केला. वासुदेव बळवंत फडके पकडले गेले. त्यांना १८८० च्या सुरूवातीस एडन येथे दीर्घमृदतीची सजा भोगण्यासाठी पाठण्यात आले. तेथेच हा विरपुरुष १७ फेब्रुवारी १८८३ रोजी मृत्यूच्या स्वाधीन झाला.

    डॉ. वि. गो. खोबरेकर

    Digital Book

    Read more
  • Placeholder

    मुंबईचा वृत्तांत

    0

    प्रस्तुत ग्रंथ : मुंबईचा वृत्तांत

    मुंबईविषयीचे दुसरे पुस्तक म्हणजे मुंबईचा वृत्तांत. हे ‘प्राचीन आणि अर्वाचीन वर्णनात्मक नकाशासह’ बाळकृष्ण बापू आचार्य व मोरो विनायक शिंगणे यांनी लिहिले आणि निर्णयसागर छापखान्यात छापून १८८९ मध्ये प्रसिद्ध केले. आपल्यापुढील कार्याचा त्यांना योग्य अंदाज होता.

    ज्या देशाचा  किंवा प्रान्ताचा इतिहास लिहावयाचा, त्याची पूर्ण माहिती ग्रंथकारास असली पाहिजे; तेथींल अनेक वयोवृद्ध व अनुभवशीर अशा गृहस्थांचा त्याच्याशीं परिचय असला पाहिजे, व त्याने त्या कामी साधनीभूत अशा अनेक ग्रंथाचे अवलोकन केलें पाहिजे. इत्यादी साधनांपैकी आम्हापाशी एकही पुरें साधन नसतां आम्ही हें धाडसाचे आणि त्यांत मुंबईसारख्या वैभवशाली शहराचा वृत्तांत लिहिण्याचे काम हातीं कां घेतलें असा प्रश्‍न साहजिक उत्पन्न होईल. होय. प्रश्‍न अगदीं बरोबर आहे. आह्मींही पूर्ण जाणत आहों की, हें काम आमच्या शक्‍तीपलिकडे आहे हें खचीत. तरी पण, यथाशक्ती प्रयत्न करून जी अल्पस्वल्प माहिती मिळविली ती तशीच दाबून न ठेवितां लोकांपुढे आणावी, बरीवाईट कशी काय असेल तशी त्यांचे ते पाहून घेतील; आणि आमचे दोष आम्हांस दाखवितील.

    असे लेखकद्वयीने प्रस्तावनेतच लिहून ठेवले आहे. ज्या पुस्तकांची त्यांनी मदत घेतली त्यात म्याक्लिन्‌स गाईड टु बॉम्बे, बुक ऑफ बॉम्बे, मुंबईचे वर्णन, राऊंड अबाऊट बॉम्बे; मुंबईनो बहार (भाग १ला), बिंबाख्यान इत्यादींचा समावेश आहे.

    नोंद: ‘मुंबईचे वर्णन’ हे कै. माडगावकराचे पुस्तक मुंबई शहरातील मराठीतील पहिले पुस्तक होय.

    मुंबईचा वृत्तांत या १८८९ साली प्रसिध्द झालेल्या पुस्तकाचे विस्तृत प्रस्तावनेसह यथामूल पुनमुुद्रण

    Digital Book

    Read more
  • -100% मुलखावेगळा-राजा

    मुलखावेगळा राजा (औंधाचा राजा)

    0

    लेखकाचे काही… 

    मुलखावेगळा राजा ही गोष्ट आहे औंधाचे भवानराव पंतप्रतिनिधीं यांची. इतिहास नाही, पण सत्य गोष्ट आहे. भावनेत, स्मृतींत, जशी नोंद झाली आहे तज्ञीच सांगितली आहे.

    व्यक्ती सर्वच्या सर्व खऱया आहेत, काल्पनिक नाहीत, त्यांच्यासंबधीचा काही मजकूर त्यांना आवडणार नाही, कदाचित बोचेलसुद्धा. त्याबद्दल अगदी सपशेल, बिनशर्त दिलगिरी. कोणाला दुखविण्याचा, डिवचण्याचा हेतू नाही.

    सर्व संवाद भावना-स्मृतीत आहेत तसे, थोड्याफार फेरफाराने घातले आहेत. हे संवाद ध्वनिफितीवर नोंदले वा कागदावर टिपले नव्हते. पण त्यामागील भावना, हेतू सत्य आहे.

    साल, महिना, तारीख कदाचित काही ठिकाणी चुकली असणार. त्याबद्दल क्षमायाचना.

    श्री. रवींद्र कुलकर्णी यदुनाथ थत्तेंना घेऊन आले नसते तर ही गोष्ट कागदांवर आली नसती.

    गोष्ट लिहिताना जो आनंद वाटला त्याबद्दल त्या दोघांना धन्यवाद.

    आप्पा पंत – (पंत निवास : बंगलोर-लोणावळा)

    “पंत निवास”, भांडारकर रोड, पुणे ४११००४

    औंधाचा-राजा-भवानराव

    Digital Book

    Original price was: ₹50.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart
  • Placeholder

    रायगडची जीवनकथा

    0

    पुस्तकाविषयी 

    “रायगडची जीवनकथा” या पुस्तकात रायगडवर घडलेला सर्वविध इतिहास साद्यंत देण्याचा प्रयत्न केला आहे. रायगडच्या इतिहासासंबंधाने आजवर जे संशोधन झाले, ते सर्व या पुस्तकात अंतर्भूत झाले आहे; तेवढ्यापुरते हे पुस्तक संकलनात्मक मानता येईल. पण रायगडच्या परिसरात हिंडून अनेक असंशोधित, अव्वल दर्जाचे कागद पाहून, नकळून घेऊन त्यांचा येथे प्रथमच उपयोग केला आहे. पेशवेदप्तरातून रायगडसंबंधीची बरीच माहिती येथे प्रथमच ग्रंथित केली आहे. श्रीभारत इतिहास संशोधन मंडळातील स. ग. जोशी-दप्तर, चंद्रचूड-दप्तर यांतील अप्रसिद्ध माहितीचा अंतर्भाव येथे केला आहे. अश्ञा तऱहेने प्रथमच पुढे येणारा मजकूर भरपूर असून त्याने या पुस्तकाची किमान दहा प्रकरणे सजविली आहेत; तेवढ्यापुरते हे पुस्तक संशोधनात्मक आहे. रायगडचा बराच अप्रसिद्ध इतिहास देऊन हे पुस्तक अद्ययावत्‌ केले आहे. पूर्वीच्या संशोधनातून निर्माण झालेले अपसमज दूर केले आहेत व अनेक संशोधित ऐतिहासिक पत्रांची मितिशुद्धि केली आहे. यायोगे, प्रस्तुत विषयातील वाचकांच्या ज्ञानात भरपूर भर पडेल, असा विश्वास वाटतो.

    रायगडचा इतिहास संशोधनपूर्वक लिहिणे हे राष्ट्रीय कर्तव्य-कर्म होते व ते ऋण फेडण्याचा लेखकाचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

    महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

    • पहिली आवृत्ती १९६२
    • दुसरी आवृत्ती १९७४
    • तिसरी आवृत्ती १९९५
    • चौथी आवृत्ती २००५
    • पाचवी आवृत्ती २००८

    Digital Book

    Read more
  • -100% पठ्ठे बापुराव

    लोकशाहीर पठ्ठे बापूराव

    0

    ज्या काळात रंजन आणि प्रबोधन लोककलाच करत, त्या काळी लोकसंस्कृती आणि लोकजीवनाला उत्साहवर्धित प्रेरणा देण्याचे आत्यंतिक महत्त्वाचे कार्य तमाशा या मराठामोळ्या लोककलेने केले आहे. खेड्यापाड्यांतील वर्षभराच्या शिणलेल्या, मरगळलेल्या लोकजीवनाला एक नवे चैतन्य लाभे. या लोककलाकारांनी, लोकशाहिरांनी सामाजिक स्तरावर सांस्कृतिक जडणघडण केली आहे. पेशवेकालीन शाहिरांच्यानंतर तमाशा कला मंदावली होती; पण पठ्ठे बापूरावांसारखा शीघ्रकवी या कलेची ब्रत म्हणून सेवा करायला लागल्यानंतर त्यांच्या तमाशांनी अवघ्या महाराष्ट्राला वेडे केले. त्यांनी तमाशा कला कळसाला नेऊन पोचवली. त्या कलेला नवा प्राण दिला. तमाशा कला ही त्यांच्या जीवनाचा श्वास बनली होती. त्यांनी लोकरंजनाबरोबर लोकप्रोबधन करण्याचे ध्येय निश्चित केले होते. त्यासाठी त्यांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवले. संसार मोडला. उच्चवर्णीय असूनही समाजाची पर्वा बाळगली नाही. गावाने बहिष्कृत केले तरी पठ्ठे बापूरावांनी हाती घेतलेला लोकजागराचा डफ खाली ठेवला नाही. त्यांच्या लेखणीने आणि वाणीने तमाशा कलेला बहर आला. एकदा म्हटलेली लावणी उद्या म्हणायची नाही, लावणी लिहिण्यासाठी एकदा कागदावर लेखणी ठेवली, की लावणी संपल्याशिवाय उचलायची नाही, शिळ्या पैशाचे तोंड पाहायचे नाही अशा या लोकविलक्षण शाहिराच्या लोकविलक्षण प्रतिज्ञा होत्या. संपूर्ण आयुष्यच त्यांनी तमाशा कलेला वाहिले होते. त्यांनी दोन लाखांहून जास्त लावण्या लिहिल्या ही घटनाही जगावेगळी होती.  आजही पठ्ठे बापूरावांच्या गण, गौळणी आणि लावण्यांशिवाय तमाशाची भैरवी होत नाही. 

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart
  • -25%

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा १

    0

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग १ प्राणीसंग्रहालय आणि चित्रचोर

    व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं.

    Original price was: ₹275.00.Current price is: ₹206.00.
    Add to cart
  • -25%

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा २

    0

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग २ मृत्युपत्रानेच घेतला बळी आणि इतर ३ कथा

    व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं.

    Original price was: ₹240.00.Current price is: ₹180.00.
    Add to cart
  • -25%

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा ३

    0

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग ३ साळिंदराचा काटा आणि इतर ३ कथा

    व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं.

    Original price was: ₹240.00.Current price is: ₹180.00.
    Add to cart
  • -25%

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा ४

    0

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग ४ रक्तमुखी नीलम आणि इतर ६ कथा

    व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं.

    Original price was: ₹240.00.Current price is: ₹180.00.
    Add to cart
  • -25% Vyomkesh bakshi 4 books

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा संच (४)

    0

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग १ प्राणीसंग्रहालय आणि चित्रचोर

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग २ मृत्युपत्रानेच घेतला बळी आणि इतर ३ कथा

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग ३ साळिंदराचा काटा आणि इतर ३ कथा

    व्योमकेश बक्षी रहस्यकथा : भाग ४ रक्तमुखी नीलम आणि इतर ६ कथा

    दूरदर्शनवर चोखंदळ प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चाणाक्ष गुप्तहेर व्योमकेश बक्षी आता मराठीत… व्योमकेश बक्षी स्वत:ला गुप्तहेर म्हणवून घेत नाही; तर तो स्वत:ला ‘सत्यान्वेषी’ असं म्हणवून घेतो. कारण त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक रहस्यमय प्रकरणातील अंतिम सत्याचा तो शोध घेतो. व्योमकेश प्रत्येक प्रकरणातील रहस्याचा ज्याप्रकारे तर्कसंगत उलगडा करतो ते पाहून थक्क व्हायला होतं. त्याचं बौद्धिक चापल्य, टप्प्याटप्प्याने रहस्य भेदत छडा लावण्याचं कौशल्य हे अत्यंत रोचक आहे. निखळ आनंद देणार्‍या या कथा वाचकाचं मन रिझवण्याबरोबरच त्याची मतीही गुंग करून टाकतील!

    Original price was: ₹995.00.Current price is: ₹750.00.
    Add to cart
  • -100% तुकारामाचे अभंग

    श्री तुकारामबावांच्या अभंगांची गाथा

    0

    निवेदन 

    पंढरपूरचा श्री विठ्ठल हा जसा आपल्या ‘विठोबा’ या मराठमोळ्या नावाने महाराष्ट्रीय समाजाच्या हृदयामध्ये अत्यंत आदरपूर्वक प्रस्थापित झाला आहे, त्याप्रमाणेच त्याचा परमभक्त संत तुकाराम यालाही महाराष्ट्राच्या मनामध्ये अद्वितीय आणि अलौकिक स्वरूपाचे स्थान मिळालेले आहे. मराठी भक्तजन श्री ज्ञानदेवांच्याबरोबरच संत तुकारामांनाही परमश्रध्येय मानतात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा उत्कट भावाने गजर करतात. श्री विठ्ठल, श्री नामदेव, संत तुकाराम ही महाराष्ट्राची आराध्य दैवते आहेत. श्री ज्ञानेश्वरांनी आपल्या अजोड प्रतिभेने जज्ञी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याच उत्कट भक्तीभावाने संत तुकारामांनी आपले अभंग लिहिले. तुकाराम हे महाराष्ट्रातील संत मंडळींचे शिरोभूषण मानले जातात. गेली साडेतीनशे वर्षे तुकारामांची गाथा महाराष्ट्राने हृदयाशी बाळगून आध्यात्मिक वाटचाल केली आहे.  

    जनसामान्यांना प्रिय असलेल्या संत तुकारामांची सकल गाथा प्रसिद्ध करून ती सर्वांना उपलब्ध करण्याचा निर्णय तत्कालीन मुंबई सरकारने १९५० साली घेतला आणि शासनामध्ये न्यायमूर्ती या उच्च पदावर काम करतानाही अंतरीचे काव्यगुण जोपासणाऱ्या आणि संत वाड्मयाचा प्रगाढ व्यासंग असलेल्या स्व. पुरुषोत्तम मंगेश लाड या विद्वान सनदी अधिकाऱ्याची गाथेच्या संपादनासाठी नियुक्ती केली. लाड हे स्वतः उत्तम कवी होते आणि त्यांचा संत वाड्मय आणि आधुनिक कविता यांचा विशेष अभ्यास होता. तुकारामांची गाथा संपादित करून प्रकाशित करण्याचे महत्‌ कार्य लाडांनी स्वीकारले आणि आपल्या अतिशय विवेचक आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह १९५० साली तुकारामांची गाथा शासनातर्फे प्रथम प्रकाशित झाली. तिचे वाचकांनी अभूतपूर्व स्वागत केले. १९५५ साली तुकाराम बीजेला गाथेची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यानंतर १९७३ साली तिसरी आवृत्ती शासनातर्फे प्रकाशित झाली आणि आता ती दुर्मीळ झालेली आहे.  

    महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे श्री एकनाथी भागवत आणि श्री नामदेव गाथा हे दोन बहुमोल ग्रंथ पुन्हा प्रकाशित करण्याचे ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे दुर्मीळ झालेली तुकारामांची गाथासुद्धा पुन्हा वाचकांना उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार १९५० साली प्रथम प्रकाशित झालेल्या गाथेच्या चौथ्या आवृत्तीच्या प्रकाशनाचा सुयोग सध्याच्या मंडळाला लाभलेला आहे. श्री नामदेव, श्री एकनाथ आणि संत तुकाराम यांचे वाड्मय महाराष्ट्राला पुन्हा अल्प किंमतीत उपलब्ध करून देण्याची सुसंधी मंडळाचा अध्यक्ष म्हणून मला लाभली, हे मी माझे भाग्य समजतो. संत तुकारामांना विनम्र भावाने अभिवादन करून ही गाथा मी महाराष्ट्राच्या चरणी अर्पण करीत आहे.  मधु मंगेश कर्णिक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. 

    Digital Book

    Original price was: ₹100.00.Current price is: ₹0.00.
    Add to cart
  • Placeholder

    समर्थ रामदासांची साहित्य सृष्टी

    0

    समर्थ चरित्राची रूपरेषा

    आपल्या महाराष्ट्राच्या भूमीला संत परंपरेचे फार मोठे वरदान लाभले आहे. विशेष म्हणजे मराठी संतांनी केवळ चमत्कार केले नाहीत तर त्यांनी चिरंतन असे आध्यात्मिक विचारधन पाठीमागे ठेवले.  हजारो वर्षे मराठी माणूस या विचारांच्या प्रकाशात जीवनाची यशस्वी वाटचाल करीत राहील. आद्यतम कवी मुकुंदराजांचा विवेकसिंधू, संत शिरोमणी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, संत नामदेव आणि संत तुकाराम यांचे हजारो अभंग, समर्थ रामदासांचा दासबोध, संत एकनाथ महाराजांचे भागवत हे सारे ग्रंथ म्हणजे महाराष्ट्राची खरी संपदा आहे. संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, संत नरहरी सोनार, संत कान्होपात्रा, संत मुक्ताबाई आदी संतांनी देखील या विचारधनात मौलिक भर घातली. महाराष्ट्रातील संतांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी केवळ भाबडेपणा किंवा अंधश्रद्धा यांना कधीही खत-पाणी घातले नाही. त्यांनी मराठी माणसाचे ज्ञानचक्षू उघडले. त्याची विचारशक्ती जागी केली. या सर्व संतांनी शास्त्रशुद्ध परिभाषेत आध्यात्मिक विचार दिले. प्रस्तुत ग्रंथात आपण समर्थ रामदासांच्या समग्र साहित्याचा परामर्श घेणार आहोत. 

    अनुक्रमणिका

    • निवेदन……
    • समर्थ चरित्राची रूपरेषा…
    • करूणाष्टके : समर्थांचे आत्मचरित्र ….
    • मनाचे श्लोक…..
    • आत्माराम…..
    • तुळजाभवानीची स्तोत्रे
    • हनुमंताची स्तोत्रे…
    • गुरुगीता
    • समर्थांचा पत्रव्यवहार
    • राजधर्म, क्षात्रधर्म अखंड सावधानता…
    • मुसलमानी अष्टक
    • ग्रंथराज दासबोध..
    • समर्थांच्या आरत्या …..
    • भौगोलिक स्थानांची वर्णन ……
    • एकवीस समासी : जुना दासबोध ….
    • काही स्फुट प्रकरणे ….
    • समर्थांची लोकसाहित्य रचना….
    • धन्य ते गायनी कळा …..
    • समर्थांचे अभंग …
    • संदर्भ ग्रंथ…..

    Digital Book 

    Read more