Timb (टिंब)

साहित्यिक आणि विचारवंत नरहर कुरुंदकर

साहित्यिक आणि विचारवंत नरहर कुरुंदकर (Narhar Kurundkar) – एक प्रसिद्ध लेखक, मराठी भाषा आणि साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून नरहरी कुरुंदकर यांनी ओळखलं जातं.

कुरुंदकरांवरचा मार्क्सवादाचा प्रभाव, तरीही त्यांची लोकशाहीवरील अढळ श्रद्धा या बाबी मी फारशा विचारात घेतल्या नाहीत. त्यांचे बिनतोड तर्क वापरुन काढलेले निष्कर्ष मला जास्त महत्त्वाचे वाटले. आजही वाटतात. विचारसरणी कुठलीही असो जर पुरावे पक्के असतील, युक्तीवाद भक्कम असेल तर समोर आलेलं सत्य कितीही कडवट असो मान्य करायला हवं हीच गोष्ट मी सर्वप्रथम कुरुंदकरांकडून शिकलो. माझ्या अनेक श्रद्धास्थानांना कुरुंदकरांच्या लिखाणामुळे धक्का बसला. काहीवेळा तो पचवणं जडही गेलं पण दुसरा इलाज नव्हता. कुरुंदकर प्रत्येक मुद्दा आपल्या असामान्य बुद्धीने क्ष किरणाप्रमाणे भेदूना आरपार विवेचन करतात तेव्हा त्यांनी काढलेल्या निष्कर्षाशिवाय दुसरा काही निष्कर्ष निघूच शकणार नाही असं वाटत राहतं.

c

फायनान्शिअल अफेअर ऑफ द कॉमन मॅन

आपल्या समोर गुंतवणुकीचे परस्परविरोधी अनेक पर्याय असतात. दीर्घकालीन मुदतीत गुंतवणूक करावी की अल्पकालीन, जास्त जोखीम घेऊन अधिक परतावा मिळवावा की कमी जोखीम असलेला पण सुरक्षित पर्याय निवडावा? स्थावर मालमत्ता, समभाग, रोखे की मुदत ठेव?

पुस्तक : फायनान्शिअल अफेअर ऑफ द कॉमन मॅन  लेखक : अनिल लांबा पृष्ठ संख्या : १४३ 

मारुती चितमपल्ली पुस्तके

मारुती चितमपल्ली लिखित पुस्तके…

वानरांना येणाऱ्या दुष्काळाची माहिती आधीच होते. म्हणूनच वानरे खाल्लेली पाने, फळे, फुले यांचा चोथा जमा करून त्यात मध मिसळून त्याचे गोळे करून ठेवतात. हे तहान आणि भूकलाडू झाडाच्या ढोलीत ते पिलांसाठी तयार करून ठेवतात. 

‘उंदीर चोरीही करतात’ असं जर कुणाला सांगितलं तर विश्वास बसेल? 

हस्तिदंत नसलेल्या नर हत्तीला ‘मुकना हत्ती’ म्हणतात. हस्तिदंतांसाठी हत्तींची शिकार केली जाते हे मादी हत्तीच्या लक्षात आल्यानंतर त्यांना होणाऱ्या पिलांमध्ये ‘जेनेटिकली’ बदल घडून येऊ लागले.

आपण म्हणतो कोकिळा गाते, पण मादी कोकिळा गात नाही, तर नर कोकिळ गातो. 

गोपाळ नीलकंठ दांडेकर (गोनीदा)

गोपाळ नीलकंठ दांडेकर हे एक अनुभवसंपन्न, सृजनशील, रसिक वृत्तीचे कलावंत आणि लेखकही होते. .तसेच गो.नी.दा. हे परिभ्रामक, कुशल छायाचित्रकार आणि दुर्गप्रेमीसुद्धा होते.

परीचितांमध्ये अप्पासाहेब आणि रसिक वाचकांचे गोनीदा, आपल्या बहुढंगी अयुष्याचे वेगवेगळे पदर अपल्या कथा- कादंबर्‍यांमधुन मांडणारे म्हणुन सुपरिचीत; इतिहास अभ्यासक, चळवळे कार्यकर्ते, अध्यात्मिक संशोधक, भटके निसर्ग प्रेमी अशा कित्येक गोष्टी-छंदांमुळे समृद्ध जीवन जगलेले आणि तेच वाचकांपुढे ससाळ आणि सुंदर शैलीत मांडणारे ग़ोनिदा वाचकांना नेहमीच भुरळ घालतात.

व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

औपचारिक शिक्षण फारसे-मॅट्रिक-पर्यंतही-झाले नाही. तथापि स्वप्रयत्नाने वाङ्‌मयाचा व्यासंग केला.माणदेशी माणसे (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला, त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले, ते तोवरच्या मराठी साहित्याला अनोखे होते. अद्‌भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला. 

ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. बनगरवाडी (१९५५), वावटळ (१९६४), पुढचं पाऊल (१९५०), कोवळ दिवस (१९७९), करुणाष्टक (१९८२) आणि सत्तांतर (१९८२) ह्या त्यांच्या कादंबऱ्या उल्लेखनीय आहेत. 

रानोमाळ स्वच्छंद भ्रमंती करणारे निसर्गप्रेमी, शिकारी तसेच चित्रकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे. चित्रकलेचे कसलेही औपचारिक शिक्षण नसताना त्यांनी ही कला प्राप्त केली जागतिक कीर्तीच्या चित्रकारांच्या चित्रशैलीचा रसिकतेने शोध घेतला. त्यांची अनेक सुंदर रेखाटने प्रसिद्ध झालेली आहेत. आकाशवाणीवर ते दीर्घकाळ (१९५५–८५) नोकरीत होते.

[email protected]

एम टी आयवा मारू

“एम टी आयवा मारू” विषयी काही – मकरंद जोशी

मोकाट सागरावरून ओसाड किनाऱ्यावर भणभणत येणा:या समुद्रवाऱ्याप्रमाणे मराठी साहित्यविश्वात ‘एम. टी.आयवा मारू’चं आगमन झालं ते वर्ष होतं 1989. मराठी साहित्यासाठी त्या कादंबरीचं नाव जेवढं अनवट होतं, तेवढीच त्या कादंबरीची बिनठशाची भाषा, बिनधास्त निवेदन आणि पूर्णपणे अनोळखी अनुभवविश्व. पंचवीस वर्षापूर्वी ते सगळंच एवढं धक्कादायक होतं की, असंख्य बिनधास्त रसिकांनी ती कादंबरी अक्षरश: डोक्यावर घेतली. ‘एम.टी.आयवा मारू’वर कौतुकाची-पुरस्कारांची उधळण केली. दशकातल्या उत्कृष्ट कादंबऱ्यांत तिची निवड झाली.

नरहर कुरुंदकर कोण होते आणि त्यांचे विचार आजही लागू होतात का?

नरहर कुरुंदकर (१५ जुलै, इ.स. १९३२ – १० फेब्रुवारी, इ.स. १९८२) हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते. ते एक प्रभावी वक्ते होते. कुरुंदकर यांचा जन्म १५ जुलै १९३२ रोजी महाराष्ट्रातील मराठवाडा भागातील नांदापूर (जि. हिंगोली ) गावात झाला. हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा हे त्यांचे मूळ गाव.

त्यांनी प्रतिभा निकेतन माध्यमिक विद्यालय, नांदेड‎ येथे शिक्षक म्हणून तर नांदेड एज्युकेशन सोसायटीचे पीपल्स कॉलेज, नांदेड येथे प्राचार्यपद भूषविले होते.विशेष बाब म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दोनदा बिनविरोध त्यांच्याकडे येऊनही त्यांनी त्याला नम्रपणे नकार दिला होता.

नरहर कुरुंदकर म्हटलं की, त्यांनी लिहिलेली साहित्य संपदा आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. जागर, रूपवेध, मनुस्मृती, शिवरात्र, अभयारण्य, वाटा तुझ्या माझ्या ही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.

आपल्याला असलेले प्रश्न संविधानाच्याच चौकटीत सोडावावेत असा त्यांचा आग्रह होता. ही गोष्ट आजच्या काळातही तितकीच लागू होते.– तुषार कुलकर्णी ( बीबीसी मराठी)

15 जुलै 2020

पुनर्लेखन  15 जुलै 2023

एल.एम.कडू यांची मुलाखत – बाल साहित्य अकादमी पुरस्कार मराठी (२०१७)

श्यामलाचे जग हा ब्लॉग आहे जो बाल लेखक, मुक्त हस्त लेखिका आणि  Kahani Takbak मुख्य विचारवंताने लिहिलेला आहे. या ब्लॉगमध्ये भारतीय बालसाहित्य जगतातील घडामोडी आणि व्यक्ती विषयावर आहे.

एल.एम.कडू यांची मुलाखत – बाल साहित्य अकादमी पुरस्कार मराठी (२०१७) – 18 जुलै 2017

मराठी साहित्यासाठी (2017) बाल साहित्य पुरस्काराने सन्मानित, लक्ष्मण महिपती कडू (एल.एम. कडू) हे शेतकरी, चित्रकार आणि लेखक आहेत. राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले खारीचा वाटा या त्यांच्या पुस्तकासाठी त्यांना  राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Shopping cart close